मुंबई : गेल्या अनेक महिन्यापासून ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चर्चेत राहिला आहे. त्यासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थामधील निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आता राज्यातील निवडणुकांसाठी मार्ग मोकळा झाला आहे. यावर आता भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“आम्हाला दुसऱ्याच्या घरात झाकून पाहण्याची सवय नाही”; नाना पटोलेंचा बोंडेंना प्रत्युत्तर
शेवटी करून दाखवलं..! ओबीसी आरक्षणाची लढाई आम्ही जिंकलो…! राज्यात ओबीसी आरक्षणासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा केल्यामुळेच ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. बांठिया आयोगाने ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्याची शिफारस केली आहे. असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टातल्या कायदेशीर लढाईतून ओबीसी राजकीय आरक्षण अखेर परत मिळालंय. अर्थात, त्यासाठी मविआ सरकार जाऊन भाजपा-शिवसेना युतीचं सरकार यावं लागलं. आरक्षण नसतं तरी 27 टक्के जागांवर OBC उमेदवार देण्याचं आम्ही ठरवलेलंच होतं. आता आरक्षण आमच्यामुळेच मिळालं, असे ढोल मविआ पिटू लागेल. ओबीसी आरक्षण परत मिळवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरक्षण परत मिळवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा वाटा आहे. एकत्रित प्रयत्नांमुळेच हे शक्य झालंय. ओबीसी आरक्षण परत मिळाल्याबद्दल सर्वांच अभिनंदन असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
“आम्हाला दुसऱ्याच्या घरात झाकून पाहण्याची सवय नाही”; नाना पटोलेंचा बोंडेंना प्रत्युत्तर
मविआ ने नेमलेल्या बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारत येत्या दोन आठवड्यात . ओबीसी आरक्षणासह निवडणूक घेण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला, हा तत्कालीन मविआ सरकारचा विजय असून ओबीसी बांधवांना त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळतंय, याचा मनापासून आनंद आहे. बांठीया आयोग स्थापन करुन ओबीसींना राजकीय आरक्षण मिळण्यासाठी मविआ सरकार असताना प्रामाणिक प्रयत्न केला गेला. आजचा निकाल हे या प्रामाणिक प्रयत्नांचं फलित आहे. याबाबत तत्कालीन मविआ सरकारचे आभार आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत. असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
आमची बाजू भक्कम, आमच्याच बाजूने निर्णय लागेल; न्यायालयाच्या सुनावणींवर फडणवीसांची प्रतिक्रिया
ओबीसी राजकीय आरक्षणाचा आमच्या महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला. सर्वोच्च न्यायालयातून ओबीसी राजकीय आरक्षणाला मान्यता मिळणे हा संपूर्ण ओबीसी समाजाचा विजय आहे. ओबीसी कल्याण, बहुजन कल्याण, गरिब कल्याण हाच आमचा अजेंडा होता, आहे आणि राहील. ओबीसी राजकीय आरक्षण प्राप्त करून देण्याच्या प्रक्रियेतील सहभागी सर्वांचे मन:पूर्वक आभार असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
Read also
- “आता आरक्षण आमच्यामुळेच मिळालं, असे ढोल मविआ पिटू लागलेत”
- संजय पांडे यांच्यानंतर आता राऊत, परब यांचा नंबर; नवनीत राणांचं सुचक वक्तव्य
- “ओबीसींना राजकीय आरक्षणाबाबत मविआ सरकारला यश आलं”; रोहित पवार
- “ओबीसी आरक्षणाचा आमच्या महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला”; देवेंद्र फडणवीस
- मोठी बातमी.. ! ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याचे न्यायालयाचे आदेश