मुंबई : गेल्या अनेक महिन्यापासून ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चर्चेत राहिला आहे. त्यासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थामधील निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आता राज्यातील निवडणुकांसाठी मार्ग मोकळा झाला आहे.
शिंदे -ठाकरे राजकीय लढाईची सुनावणी पुढे ढकलली ; सर्वोच्च न्यायालयाने दिली नवी तारीख
सर्वोच्च न्यायालयात आज ओबीसी आयोगाच्या अहवालावर सुनावणी करण्यात आली. तसेच निवडणुक कार्यक्रमात कोणताही बदल होणार नाही, तसेच बांठिया आयोगाच्या शिफारशीनुसार निवडणुका घ्या असे आदेश देखील सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.
ठाकरे अन् शहांनी चर्चा केल्यानंतर बाहेर आले अन्..; दानवेंनी सांगितला ‘तो’ किस्सा
ओबीसी आरक्षणामुळे राज्यातील जाहीर करण्यात आलेल्या 92 नगरपरिषद आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगिती करण्यात आल्या होत्या. तसेच महापालिकेच्या निवडणुकां देखील यामुळे खोळंबून राहिल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे आता राज्यातील निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच देशातील 367 ठिकाणी निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालायाने राज्यांना दिले आहेत.
“इडीकडून राऊतांना पुन्हा नोटीस”; किरीट सोमय्या म्हणाले की, “अब संजय राऊत की बारी है…”
दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सुनावणीत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा आयोजित करण्यात आला आहे. ओबीसी आरक्षणावर चर्चा करण्यासाठी हा दिल्ली दौरा आहे. राज्यातील सरकार ओबीसींना त्यांचा हक्क मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
Read also
- “आम्हाला दुसऱ्याच्या घरात झाकून पाहण्याची सवय नाही”; नाना पटोलेंचा बोंडेंना प्रत्युत्तर
- “आम्हाला दुसऱ्याच्या घरात झाकून पाहण्याची सवय नाही”; नाना पटोलेंचा बोंडेंना प्रत्युत्तर
- आमची बाजू भक्कम, आमच्याच बाजूने निर्णय लागेल; न्यायालयाच्या सुनावणींवर फडणवीसांची प्रतिक्रिया
- कोर्टात प्रकरण प्रलंबित असताना राज्यपालांनी शिंदेना शपथ दिलीच कशी?
- “तर बाळासाहेबांना आम्हीच शिवसेनेत आणलं, असंही ते उद्या म्हणतील”