मुंबई: राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी नेते कृपाशंकर सिंह भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. कृपाशंकर सिंह यांचा राजकारणावर असलेला प्रभाव पाहता महापालिकेतील राजकारणाची सर्व समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संदर्भात उल्लेखनीय आहे की, बेहिशोबी मालमत्ता आणि घरी काडतुसे सापडल्याप्रकरणी कृपाशंकर सिंह मधल्या काळात अडचणीत आले होते. तेव्हा पासून ते सक्रिय राजकारणातून बाहेर फेकले गेले होते.
हे पण वाचा: मी फडतूस माणसांविषयी बोलत नाही, नितेश राणे यांच्या टीकेला भास्कर जाधव यांचे प्रत्युत्तर
हे पण वाचा: भास्कर जाधव यांना मिळणार संरक्षण; गृहमंत्र्यांनी दिली विधानसभेत ग्वाही
दरम्यान, २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० व ३५ अ हटविण्यात आल्यानंतर काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर कृपाशंकर सिंह यांनी प्रश्न केले होते. काँग्रेसच्या भूमिकेच्या निषेधात त्यांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया यांच्याकडे राजीनामा पाठवला होता. त्यानंतर ते कोणत्याही पक्षाक्षी जुळले नाहीत. मात्र, त्यांनी या काळात त्यांची भाजपा याच्या नेत्यांशी जवळीक वाढली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सिंह यांच्या घरी गणपतीत जात होते.
हे पण वाचा: भास्कर जाधवांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याच्या धमक्या, केली सुरक्षा पुरवण्याची मागणी
पालिकेच्या राजकारणाचे समीकरणे बदलणार
मुंबईत अंदाजे ४० – ५० लाख उत्तर भारतीय मतदार आहेत. या मतांची टक्केवारी २० ते २५ टक्के आहे. मुंबईतील अनेक मतदारसंघात उत्तर भारतीयांची मते निर्णायक संख्येत आहेत. या मतदारांमध्ये कृपाशंकर सिंह यांचा चांगला प्रभाव आहे. त्यांच्या भाजपा प्रवेशाचा पक्षाला फायदा होणार असून काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा: त्यांना परवानगी दिली कोणी; भास्कर जाधवांचा भाजपच्या प्रतिविधानसभेवर सवाल
कृपाशंकर सिंग कोण आहेत?
कृपाशंकर सिंग हे काँग्रेसचे मुंबईतील वरिष्ठ नेते आहेत. उत्तर भारतीयांची मत काँग्रेसकडे वळवण्यात कृपाशंकर सिंग यांचा वाटा मोलाचा मानला जातो. काँग्रेसच्या सत्ताकाळात २००४ साली कृपाशंकर सिंग राज्यमंत्री होते. २००९ साली विधानसभा निवडणुकीत मुंबईत काँग्रेसला चांगले यश मिळाले होते. त्या यशाचे बहुतांश श्रेय कृपाशंकर सिंग यांना जाते, असे मानले जाते. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष, आमदार, राज्यमंत्री म्हणून कृपाशंकर सिंग यांनी काम केले आहे.