मुंबई : काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेला लोकांचा उत्सुर्फ प्रतिसाद मिळत आहे. त्याच अनुषंगाने मुंबई काॅंग्रेसच्या वतीने गांधी जयंतीनिमित्त रविवारी ऑगस्ट क्रांती मैदान ते मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत नफरत छोडो, भारत जोडो यात्रा काढण्यात येणार आहे. यामध्ये, शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस, कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, रिपल्बिकन पक्ष आणि इतर सामाजिक संघटना सहभागी होणार आहेत.
“शाळेत महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन झालेच पाहिजे”; छगन भुजबळांचा आग्रह
राहुल गांधी यांचा भारत जोडो यात्रा ही राजकीय नसून देशाच्या हिताची आहे. त्यामुळे या यात्रेत सगळ्यांनी सहभागी व्हावं. यामध्ये कुणाला विरोध करण्याचं काहीही कारण नाही. अशी भूमिका आमची आहे. असं काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. प्रभू रामचंद्र हे आमचे भगवान आहेत. इश्वर आहेत. अन् राहुल गांधी हे मनुष्य आहेत. परंतु त्यांनी माणुसकी जोपासली आहे. ते मानवतेसाठी काम करीत आहेत. त्यांची कुठलीही तुलना केली नाही. प्रभू रामांने अशा पद्धतीच्या पदयात्रा केल्या होत्या. असं म्हणण्याचा माझा हेतू होता. असं म्हणत नाना पटोले यांनी राहुल गांधी अन् प्रभू रामचंद्र यांच्या वक्तव्यावर आपलं स्पष्टीकरण दिलं.
“पेंग्विन सेनाच महाराष्ट्राची भरभराट करणार”; पेडणेकरांचं भाजपला जोरदार प्रत्युत्तर
ज्यावेळी अयोध्यामध्ये प्रभू रामाच्या मंदिराचं शिलान्यास करण्यासाठी गेला होता. त्यावेळी भगवान राम केवढासा दाखवला होता. अन् तुमचे महामहिन, विश्वगुरू आणि स्वयंघोषित त्यांना कसं दाखवलं होतं. असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. हेही महाराष्ट्राने पाहिलं. भगवान राम हे आमचे दैवत आहेत. ते आमच्या ह्यदस्थानी आहेत. आम्ही कधीही त्यांची तुलना राहुल गांधी यांच्याशी करणार नाहीत. राहुल गांधी या देशातील जातीधर्मातील लोकांना एकत्र आणण्यासाठी, तिरंगा वाचवण्यासाठी त्यांना केलेली पदयात्रा मनुष्य धर्माची आहे. जे भगवान रामचंद्रांनी दाखवलं होतं. त्या पावलांवर राहुल गांधी चालत आहेत. असं देखील नाना पटोले म्हणाले.
Read also
- “एकनाथ शिंदेंमुळे उद्धव ठाकरेंचे सगळे आजार गायब झालेत”; संदीपान भुमरेंची फटकेबाजी
- मोदींनी दिलेला स्वच्छतेचा संदेश तळागाळापर्यंत पोहचविण्याचे गिरीश खत्रींचं काम ; मोहोळ
- सरनाईकांवर जनहित याचिका दाखल..! दफन भूमीसाठी राखीव असलेला भूखंड हडप केल्याचा आरोप
- “मला कुत्रा निशाणी दिली तरी निवडून येईन, माझ्या मतदारसंघात भाजपाशी युती नको”; अब्दुल सत्तार
- “जर RSS वर बंदी घालण्याची मागणी होत असेल तर…;”सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य