नवी दिल्ली : पीओके अर्थात पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे हे पाकिस्तानने मुळीच विसरु नये. पूर्वीही पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग होता, आताही आहे आणि यापुढेही असेल असं म्हणत भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यानी गिलगिट बाल्टिस्तानला प्रांताचा दर्जा देण्याची घोषणा केली. पाकिस्तानच्या या निर्णयाचा भारताने तीव्र निषेध केला आहे. पीओकेमध्ये कोणताही बदल स्वीकारला जाणार नाही हे सांगत पाकिस्तानला भारताने इशारा दिला आहे. गिलगिट-बाल्टिस्तान हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचं भारताने स्पष्ट केलं आहे .
दरम्यान इम्रान खान सरकार या प्रांतात विधानसभा निवडणूक घेण्याच्या तयारीत आहे. चीनचं कर्ज आणि दबावानंतर पाकिस्तानने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. याच मुद्द्यावरुन भारताने पाकिस्तानवर टीका केली होती. आता आज केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही पाकिस्तानला ठणकावत इशारा दिला आहे.
Read Also :