सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या 40 आमदारांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. शिवसेनेच्या 12 खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. राज्यातील अनेक शिवसैनिक शिंदे यांना समर्थन देत आहेत. तर भाजपकडून राष्ट्रवादी पक्षातील काही बड्या नेत्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चाही सुरू आहे. रामराजे यांनी आपण राष्ट्रवादी पक्षातच असलेयाचं सोशल मीडियातून घड्याळ हे चिन्ह ठेऊन कळेल ही आशा अशा सूचक शब्दात सांगितले आहे.
उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांकडून मोठं गिप्ट; सदस्य नोंदणीचे अर्ज अन् शपथपत्राचे मोठे गठ्ठे भेट
या अवस्थेतुनच काहींनी भाजपचा रस्ता धरल्याची चर्चा जिल्ह्यात गेल्या काही आठवड्यापासून हेती. रामराजे स्वतः त्यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांच्यासह जिल्ह्यातील इतर नेत्यांनाही सोबत घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, रामराजेंनी या चर्चांना पुर्णविराम मिळावा, असं रामराजे नाईक-निबाळकर म्हणाले.
“तुमच्या मनात बाळासाहेब ठाकरेंबाबत इतका पझेसिव्ह पणा का?” मनसेचा सवाल
पक्षाशी बांधिलकी वगैरे गोष्टी आता गौण झाल्या असून, सध्या सत्ता आणि वर्चस्व यांनाच प्राधान्य दिल्याचे दिसते. कोणत्याही मार्गाने सत्ता मिळवायची आणि कायम सत्तेत कसे राहू, याकडे अधिक कल असल्याने सध्या पक्षांच्या बाबतीत वरिष्ठ नेतेही संधीच्या शोधात आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्येही शरद पवारांचे नेतृत्व मानणारे नेते आहेत. मात्र, दुसऱ्या फळीतील नेत्यांशी त्यांचे फरसे जमेनासे झाले आहे. त्यामुळे योग्य वेळी निर्णय घेण्याच्या तयारीत राष्ट्रवादीतील काही नेते असल्याचे बोलले जात आहे.
‘शिवसेना पक्षप्रमुख’ असा उल्लेख टाळत शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
काँग्रेस, राष्ट्रवादी असो अगर शिवसेना या पक्षांवर काही ठरावीक प्रमुखांची मालक आहे. ती सोडवण्याची त्यांची इच्छा नाही. त्यामुळे आपल्या घरातील कोणीतरी पक्षाची धुरा पुढे सांभाळावी, अशी त्यांची अपेक्षा असते. त्यातून काही निष्ठावंत नाराज होतात. त्यामुळे पक्षावरचा ताबा मिळविण्याचा किंवा स्वतंत्र गट स्थापण्याचा प्रयत्न होतो आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीमध्ये असाच विचार पुढे येऊ लागला आहे.
Read also
- “आपला राजकीय बळी जाणार, हे माहित असताना तातडीने मी पवार साहेबांना फोन लावला”; आव्हाडांनी सांगितला तो जुना किस्सा
- “शिंदे-फडणवीसांनी डावललं तर शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना सावरलं”
- “उद्धव ठाकरेंना मराठा समाज्याच्या नेत्यांना मोठं होऊ द्यायचं नाही”; रामदास कदमांचं ठाकरेंवर खळबळजनक आरोप
- “काय ती जनहिताची उत्तरे, काय ती मुलाखत, एकदम ओक्के”; काॅंग्रेसने पुन्हा एकदा डिवचलं
- “काय ती जनहिताची उत्तरे, काय ती मुलाखत, एकदम ओक्के”; काॅंग्रेसने पुन्हा एकदा डिवचलं