मुंबई – भाजपचे खासदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे त्यांच्या वक्तव्यामुळे बरेचदा चर्चेत असतात. त्यांचं आणखी एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. ‘ब्राम्हणाला या राज्याचा मुख्यमंत्री झाल्याचं पाहू इच्छितो असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं आहे.
3 मे रोजी जालन्यात आयोजित परशुराम जयंतीच्या कार्यक्रमात बोलताना दानवेंनी हे वक्तव्य केलं. हे वक्तव्य समोर आल्यानंतर त्याला शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. नसत्या भानगडी सोडा असं म्हणत त्यांनी दानवेंनाच टोला हाणला आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील दानवेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
शरद पवारांवर आरोप म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा, खरे जातीयवादी राज ठाकरेच
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, मी केवळ ब्राह्मणाला नगरसेवक किंवा नगराध्यक्ष पाहू इच्छित नाही ब्राह्मणाला या राज्याचा मुख्यमंत्री पाहू इच्छितो. या देशाला दिशा देण्याचे काम आपण सर्व (ब्राम्हण) समाजानं केलं असल्याचेही दानवे म्हणाले.
रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यात विशिष्ट जातीचा मुख्यमंत्री व्हावा असं म्हणणे योग्य नाही. तृतीयपंथी पण मुख्यमंत्री होऊ शकतात. यात काहीच हरकत नाही. मात्र जे कोणी 145 चा बहुमताचा आकडा जमवू शकतील त्यांचा मुख्यमंत्री बसेल, असं अजित पवार म्हणाले.
Read also:
- राज्यात मनसेचं जोरदार आंदोलन; गैरहजर असणाऱ्या वसंत मोरेंनी सोडलं मौन, म्हणाले..;
- तुरुंगातुन सुटका होताच, नवनीत राणा रूग्णालयात दाखल; अनेक व्याधींनी त्रस्त
- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शरद पवार ॲक्शन मोडवर; घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- “राज ठाकरे उत्तम व्यंगचित्रकार, पण भाजपने हात कलम केले, भोंगावादाचा हिंदूंवर बूमरँग होणार”
- एनडीएच्या विस्तारासाठी भाजपाची नवी योजना; शिवसेनाची जागा मनसे घेणार?
- आघाडीला धक्का देत कॉंग्रेस वंचितसोबत जाण्याची शक्यता; महापालिकेच्या निवडणुकांचं बिगुल लवकरच वाजणार