मुंबई – लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपाने एनडीएची फेरबांधणी करण्याची तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रात शिवसेना एनडीए (रालोआ)मधून बाहेर पडली आहे. तर महाराष्ट्रात शिवसेनेच्या जागी मनसेला घ्यावे, असा विचार राज्यातील काही नेत्यांनी मांडला आहे. असे झाले तर महाराष्ट्रात एनडीएमध्ये शिवसेनेच्या जागी मनसे येऊ शकते.
राज ठाकरे यांनी सध्या हाती घेतलेला मशिदींवरच्या बेकायदा लाउडस्पीकरचा मुद्दा दिल्लीपर्यंत गाजतो आहे. त्यांची शैली आणि त्यांच्याकडे गर्दी खेचण्याचे असलेले कसब पाहता आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपासूनच मनसेला ‘एनडीए’शी जोडून घेण्यासाठी भाजपाचे महाराष्ट्रातील नेतृत्व आग्रही आहे. मात्र, राज ठाकरेंना सोबत घेतल्यास उत्तर भारतच्या मतांना किती फटका बसू शकतो, याबाबत पक्षाने काही सर्वेक्षणेही केल्याची माहिती आहे. पक्षनेत्यांच्या मते राज ठाकरेंची सध्याची भूमिका ही कसर भरून काढेल आणि याच भूमिकेमुळे २०२४ च्या आधी त्यांच्या ‘एनडीए’ प्रवेशाला फारसे अडथळे राहणार नाहीत, असे संकेत आहेत.
नवनीत राणा आणि रवी राणा यांना जामीन मंजूर; १२ दिवसांनी कोठडीतून होणार सुटका..
दरम्यान पंजाबमध्ये अकाली दल देखील एनडीएमधून बाहेर पडले आहे. पंजाबामध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग-भाजपा आघाडी विधानसभेला अपयशी ठरली असली तरीही राज्यात कॅप्टन यांचा प्रभाव कायम असून त्यांच्याकडे आजही लोकप्रिय नेते म्हणून पाहिले जात आहे, त्यामुळे २०२४ मध्येही कॅप्टन अमरिंदर यांच्याबरोबरची आघाडी भाजपाने कायम ठेवावी असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांचे मत आहे. याशिवाय सज्जाद लोन यांच्याबरोबर आघाडी केल्यास कलम ३७० रद्द केल्यानंतरही खोऱ्यातील अद्याप कायम असलेली धग कमी होऊ शकेल अशी भाजपाला आशा आहे.
पंजाबमध्ये अकाली दलाच्या जागी काँग्रेसमधून बाहेर पडलेले कॅप्टन अमरिंदरसिंग, जम्मू-काश्मीरचे सज्जाद लोन यांच्यासह अनेक प्रादेशिक पक्षांनाही ‘एनडीए’च्या छत्राखाली आणण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. मध्यप्रदेशमध्ये गोंडवाना गणतंत्र पक्ष, पश्चिम बंगालमधील ‘भद्र’ समाजावर प्रभाव टाकणाऱ्या समविचारी प्रादेशिक पक्षांना ‘एनडीए’सोबत ठेवण्याचे किंवा नव्याने जोडून घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचीही माहिती आहे.
Read also:
- आघाडीला धक्का देत कॉंग्रेस वंचितसोबत जाण्याची शक्यता; महापालिकेच्या निवडणुकांचं बिगुल लवकरच वाजणार
- कुणाला अल्टिमेटम द्यायाचा, तो घरच्यांना द्या! ही काही हुकूमशाही नाही; अजित पवारांनी राज ठाकरेंना सुनावलं
- शिर्डीत मुस्लिम समाजाचा नवा आदर्श; रोहित पवार म्हणाले, इथल्या जनतेच्या रक्तात ती भिनलीय
- राऊतांची तोफ आज पुण्यात धडाडणार; भोंगा, हनुमान चालिसा, हिंदुत्व, नेमकं काय बोलणार?
- ‘पुन्हा एकदा राजकारणासाठी भाजपने राज ठाकरे यांचा बळी दिला’
- “उद्धव ठाकरे आणि माझ्या पत्नीमध्ये एक साम्य…”; फडणवीसांनी केला खुलासा..
- “पिंपरी-चिंचवड भाजपाचा निर्धार ‘अब की बार १०० पार’!”; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आमदार लांडगेंची पहिली प्रतिक्रिया