मुंबई – राज ठाकरेंचा वापर राजकरणासाठी केला गेला आहे. त्यांचे भोंगे त्यांच्यावरच उलटत आहेत निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत.आमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. भाजपनं पुन्हा एक राज ठाकरेंचा बळी दिला आहे, अस वक्तव्य शिवसेन खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मनसेच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपने महाराष्ट्रात हिंदुत्वाचा गळा घोटला, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. भाजपने मनसेला पुढे करुन हा विषय चर्चेत आणला, गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत यांनी यावेळी हिंदूना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. राज ठाकरेंच्या या निर्णयानं हिंदू नाराज झाले आहेत हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं काम सुरु झालं आहे हिंदूमध्ये संताप आहे पण हिंदूनी आता संयम बाळगला पाहिजे असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे.
“संजय राऊतांचा बाबरी मशिदीशी काय संबंध”; राऊतांच्या टीकेला आशिष शेलारांचं उत्तर
संजय राऊत म्हणाले, राज ठाकरेंविरोधात सीएमओ कार्यालयात तक्रारी आल्या आहेत. हिंदूसाठी आणि श्रद्धाळूसाठी आजचा दिवस काळा मानला जातो. आज सकाळपासून महाराष्ट्रातील तीर्थस्थानंवरची काकड आरती बंद झाली आहे. शिर्डी, नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरातल्या आरत्या बंद झाल्या आहेत. भोंग्यांच्या निमित्ताने सर्व मंदिरांवरचे भोंगे बंद झाले आहेत.
आज भोंग्याचा विषय निर्माण झाल्यामुळे या देवस्थानावर लाऊडस्पीकर लागले नाहीत आणि हिंदू भाविकांची गैरसोय झाली त्यांना काकड आरतीचा आनंद घेता आला नाही असा गुप्तचार खात्याचा अहवाल असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. मशिदीवरील भोंग्याचा विषय पुढे करुन भाजपने आणि त्यांच्या उपवस्त्राने हिंदुंचा गळा घोटला हे स्पष्ट झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.
“एकाला मुख्यमंत्री पद गेल्याचं दुःख, तर दुसऱ्याला भाऊ मुख्यमंत्री झाल्याचं दुःख झालं”
हजारो लोकांनी तक्रार केल्या आहेत, आमच्यावर अन्याय का होतो. शिर्डीतील हजारो लोकांनी नाराजी व्यक्त केली. हिंदुत्वासाठी आणि श्रद्धाळूंसाठी आजचा दिवस हा काळा दिवस असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ज्यांनी हे आंदोलन सुरु केलं आहे त्याविरुद्ध आता हिंदुंमध्या जागृती होतेय, आणि हिंदुच रस्त्यावर उतरले तर आश्चर्य वाटणार नाही, पण हिंदुंनी संयम राखावा असं आवाहन संजय राऊत यांनी केलं.
भोंग्याचा नियम पाळायचा असेल तर सर्व धर्मियांसाठी आहे. याचा सर्वात जास्त फटका हा हिंदु धर्मियांना बसला आहे. मशिदीवरील भोंग्याचं काय करायचं हे कोण एक व्यक्ती घेऊ शकत नाही, त्यासाठी कायदा आहे असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.हिंदुंमध्ये फूट पाडण्याचं कारस्थान असून यामागे भाजपचा हात आहे. भाजपने पुन्हा एकदा राज ठाकरेंचा बळी दिला आहे. जी गोष्ट भाजपला जमत नाही अशा गोष्टी भाजप लहान पक्षांना हाताशी धरून करत असते. आज पुन्हा एकदा हे स्पष्ट झालं. भाजपने राज ठाकरेंचा वापर करुन त्यांचा बळी दिला असे संजय राऊत म्हणाले.
Read also:
- “उद्धव ठाकरे आणि माझ्या पत्नीमध्ये एक साम्य…”; फडणवीसांनी केला खुलासा..
- “पिंपरी-चिंचवड भाजपाचा निर्धार ‘अब की बार १०० पार’!”; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आमदार लांडगेंची पहिली प्रतिक्रिया
- “अजान दिली तर हनुमान चालिसा लावली जाणारच”; राज ठाकरे अजूनही निर्णयावर ठाम
- ‘खरी समस्या भोंगे नाही, त्यांना संपवण्याची हीच वेळ’; नितेश राणेंची दुसरी मागणी
- राज्यभरातून मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; संदीप देशपांडे, संतोष धुरी यांची पोलिसांच्या हातावर तुरी
- नवनीत राणा आणि रवी राणा यांना जामीन मंजूर; १२ दिवसांनी कोठडीतून होणार सुटका..