मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर राज्यात अनेक ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी भोंगे न लावता अनेक मशिदींमध्ये नमाज पठण करण्यात आले. तर काही मशिदींमध्ये भोंग्यांचा आवाज आल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी त्याच मशिदींसमोर हनुमान चालिसा लावल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यातच आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी भोंगे ही खरी समस्या नसल्याचे म्हणत एक दुसरीच मागणी केली. रझा अकादमी आणि पीएफआय या संघटनांवर बंदी घातली तरच शांतता निर्माण होतील, असे निलेश राणे म्हणाले आहेत.
राणे यांनी याबाबत ट्विट करून दोन्ही संघटनांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यांना संपवण्याची हीच वेळ असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. ‘भोंगे ही खरी समस्या नाही. रझा अकादमी आणि पीएफआय या विष कालवणाऱ्या दहशतवादी संघटना खरी समस्या आहे. त्यांच्याविरोधात एकत्रितपणे लढा उभारण्याची ही वेळ आहे. प्रत्येकाने एकत्र येऊन त्यांच्यावर बंदी घालण्यासाठी दबाव टाकायला हवा. त्यानंतरच शांतता नांदेल,’ असे राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
Loudspeakers r not the real problem..
The real problem r terrorist organizations like Raza academy n PFI who spread poison..
a collective fight against them is the need of the hour..
Every1 shud come together 2 ensure they r BANNED..
Then there will be PEACE! @RSSorg— nitesh rane (@NiteshNRane) May 4, 2022
Raza academy is a terrorist organisation which is not even registered with the charity commission..
Means no registration number still the state gov let’s it organise protest n operate..
How do v know who funds them?
All their operations shud b stopped asap!!— nitesh rane (@NiteshNRane) May 4, 2022
A real Muslim will never go against his state or country!
They love our soil as much as the Hindus and others..
It’s organisations like Raza academy n PFI who use the community to spread anger n hate..
Amravati n Nanded riots r best example of this..
It’s time to finish them!— nitesh rane (@NiteshNRane) May 4, 2022
थेट प्रक्षेपण | प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांची पत्रकार परिषद
रझा अकादमी ही दहशतवादी संघटना आहे. धर्मादाय आयुक्तालयाकडे या संघटनेची नोंद नाही. म्हणजे नोंदणी क्रमांक नाही. तरी राज्य सरकार या संघटनेला आंदोलन करण्यास आणि सुरू ठेवण्याची परवानगी देत आहे. त्यांना कोण निधी देते हे याची माहिती कशी मिळणार? या संघटनांची सर्व कामे थांबवायला हवे. खरे मुस्लिम हे कधीच राज्य किंवा देशाच्या विरोधात नसतील. हिंदू आणि इतर धर्मियांप्रमाणेच तेही आपल्या भूमीवर प्रेम करतात. रझा अकादमी आणि पीएफआयसारख्या संघटना समाजामध्ये द्वेष निर्माण करतात. अमरावती आणि नांदेडमधील दंगली हे त्याचे उदाहरण आहे. त्यामुळे आता त्यांना संपवण्याची हीच वेळ आहे, असे राणे यांनी आक्रमकपणे म्हटले आहे.
Read also:
- राज्यभरातून मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; संदीप देशपांडे, संतोष धुरी यांची पोलिसांच्या हातावर तुरी
- नवनीत राणा आणि रवी राणा यांना जामीन मंजूर; १२ दिवसांनी कोठडीतून होणार सुटका..
- “..या राज्याचे मुख्यमंत्री शरद पवार!”; संजय राऊतांचा व्हिडीओ मनसेने केला व्हायरल
- राज, राणे आणि राणा म्हणजे RRR चित्रपट; छगन भुजबळ यांची राजकीय घडामोडींवर खोचक प्रतिक्रिया
- “राऊतांचा जीव केवढा आणि ते बोलतात किती”; दरेकरांचा संजय राऊतांना टोला
- “मनसेला मिळणारा प्रतिसाद पाहून गुन्हा दाखल, सुडापोटी सरकारकडून कारवाई”; दरेकरांची प्रतिक्रिया