पुणे : राज्यात सध्या महाविकास आघाडी सरकार विरूद्ध भाजप असा राजकीय संघर्ष पेटला आहे. त्यात मनसेने ही या दोघांच्या राजकारणात उडी घेतल्याने राज्यातील राजकारण एक वेगळ्याच वळणावर गेलेले दिसत आहे. याचाच धागा पकडत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रविकांत वरपे यांनी भाजप आणि मनसेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
“मार्केटिंगचा जमाना भोंगेधारी, पुंगीधारी”; उद्धव ठाकरेंचा भाजप-मनसेवर निशाणा
ते म्हणाले की, एकाला मुख्यमंत्री पद गेल्याचं दुःख तर दुसऱ्याला भाऊ मुख्यमंत्री झाल्याचं दुःख झालं आहे. त्यामुळे या दोघांनी सध्या महाराष्ट्रात अकांतांडव तमाशा लावला आहे . ही मेक शरद पवार साहेब यांनी मारली आहे म्हणून दोघांचा त्यांच्यावर सध्या आरोपांचा भडिमार सुरू आहे. पण साहेब…साहेब आहेत. अशी खोचक टिप्पणी देखील केली आहे.
“ईडीची पिडी टाळण्यासाठी अन् भाजपला खुश करण्यासाठी राज ठाकरेंची सभा”; धनंजय मुंडेची खोचक टिप्पणी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल औरंगाबाद येथे रिज गर्जना करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टिकास्त्र सोडलं. त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीवर प्रहार करत राज्यात राष्ट्रवादीमुळे जातीयवाद वाढला असल्याचं वक्तव्य केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून येण्यासाठी शरद पवारांनी राज्यात जातीय विष पेरलं असल्याची टीका देखील केली.
भोंगा कमळाला किती त्रास देतोय, ते आगामी काळात दिसेल;” शिवसेनेचा राज ठाकरेंना टोला
दरम्यान, बाबरी मशिदीवरील ढाच्याचा उल्लेख करत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील शिवसेनेवर जोरदार टीका केली. बाबरी मशिद ज्यावेळी पाडली तेव्हा महाराष्ट्रातील एकही नेता त्याठिकाणी उपस्थित नव्हता, असं ही ते म्हणाले.
Read also:
- “छान आहे, अशीच गुणी मंडळी जोपासा”; मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अमृता फडणवीसांची मिश्किल टिप्पणी
- ‘कालचं भाषण म्हणजे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची मिलीभगत’
- “विरोधी पक्षाच्या अंगात जो रावण संचारलाय, त्यांनी त्यांचा अंत करावा”; राऊतांचा फडणवीसांना खोचक टोला
- “सगळ्यांना पवार साहेबांच्या राजकारणाचा कंटाळा आला”; निलेश राणेंची पवारांवर जहरी टिका
- राज ठाकरेंचं भाषण सुरू असतानाच मशिदीवरील अजाण सुरू झालं; अन् राज भडकले