सांगली – राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची काल बुस्टर डोस सभा पार पडली. तर दुसरीकडे राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा पार पडली. राज ठाकरे यांच्या भाषणात मला काहीच दम वाटला नाही. पण शरद पवारांचा द्वेष, त्यांच्याविरोधात बोलणे, अशी स्क्रिप्ट कुणीतरी राज ठाकरे यांना कुणीतरी दिली आहे. ती स्क्रिप्ट वाचण्याचा दबाव राज ठाकरेंवर दिसत आहे आणि त्यामुळे ते नाईलाजास्तव शरद पवारांवर टीका करत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली आहे.
“मार्केटिंगचा जमाना भोंगेधारी, पुंगीधारी”; उद्धव ठाकरेंचा भाजप-मनसेवर निशाणा
राज ठाकरे यांच्याकडे नवीन काही सांगण्यासारखे नाही असे दिसत आहे. त्यामुळे भाषणावेळी राज ठाकरे यांची फारच केविलवाणी अवस्था झाली होती. देशातल्या वाढत्या महागाईवर बोलून मग राष्ट्रवादीच्या नेत्यांना शिव्या-शाप द्यायचे असतील तर द्या. पण राज ठाकरेंनी देशतल्या महागाईच्या मुद्द्यावरही बोललं पाहिजे पण ते महागाईवर बोलत नाहीत, कारण राज ठाकरेंच्या भाषणाची स्क्रिप्ट भाजपने लिहून दिलेली आहे, असा खोचक टोलाही जयंत पाटील यांनी लागावला आहे.
मुंबईत देवेंद्र फडणवीसांचे भाषण संपले आणि तिकडे औरंगाबादमध्ये राज ठाकरे भाषण सुरु झाले. फडणवीस आणि राज ठाकरे या दोघांकडूनही भाषणाचे पूरक टायमिंग साधून टीव्ही मीडिया व्यापून घेण्याचा प्रयत्न अचूक केला. यातून दोघांचीही मिलीभगत असल्याचेच सिद्ध होत आहे. अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली. खासकरुन शरद पवार यांच्यावर टीका केली की मिडीया कव्हरेज मिळतेच. त्यामुळे राज ठाकरे सतत शरद पवारांवर बोलले.
मशिदीवरील भोंगे काढायला लावले तेव्हा हातभर फाटली, अन् हेच सांगता आम्ही बाबरी मशिदी पाडली
शरद पवार यांच्याविरोधात बोलून राज्यात जातीयवादी विष कालवून जाती धर्मात तेढ निर्माण करुन कसे समाजात विष कालवता येईल आणि त्यासाठी जितके जास्त चिथावणीखोर बोलता येईल यासाठी राज ठाकरे प्रयत्न करत होते. पण महाराष्ट्रातील हिंदू आणि मुस्लिम हुशार आहेत मतांच्या राजकारणासाठी हे सर्व सुरु आहे हे त्यांनाही माहिती झालं आहे. त्यांना हिंदू-मुस्लिमांच्या विकासाचे देणेघेणे नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
राज ठाकरे भाजप विरोधात एक शब्दही बोलत नाहीत, दिवसेंदिवस वाढत्या महागाईवरही राज ठाकरे यांनी बोलायला हवं पण ते भाजप विरोधात का बोलत नाहीत, याचं राज ठाकरे उत्तर देऊ शकत नाहीत. कारण राज ठाकरेंवर ईडीचा किंवा अन्य कोणाचा दबाव असल्याने ते फक्त शरद पवारांच्या विरोधातच बोलत असतात. असे जयंत पाटील म्हणाले.
Read also:
- “विरोधी पक्षाच्या अंगात जो रावण संचारलाय, त्यांनी त्यांचा अंत करावा”; राऊतांचा फडणवीसांना खोचक टोला
- “सगळ्यांना पवार साहेबांच्या राजकारणाचा कंटाळा आला”; निलेश राणेंची पवारांवर जहरी टिका
- राज ठाकरेंचं भाषण सुरू असतानाच मशिदीवरील अजाण सुरू झालं; अन् राज भडकले
- “मार्केटिंगचा जमाना भोंगेधारी, पुंगीधारी”; उद्धव ठाकरेंचा भाजप-मनसेवर निशाणा
- “ईडीची पिडी टाळण्यासाठी अन् भाजपला खुश करण्यासाठी राज ठाकरेंची सभा”; धनंजय मुंडेची खोचक टिप्पणी
- भोंगा कमळाला किती त्रास देतोय, ते आगामी काळात दिसेल;” शिवसेनेचा राज ठाकरेंना टोला