मुंबई – भाजपने आपल्या बुस्टर सभेत बाबरी मशीद पाडण्याच्या मुद्द्यावरुन शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. राम मंदिर आंदोलनात शिवसेना कुठे होती ? असा थेट सवाल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलच तापले. त्यानंतर शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी फडवीसांना प्रत्युत्तर दिले. बाबरीच्या वेळी शिवसेना कुठे होती, हे तुमच्या नेत्यांना विचारा असा टोला राऊतांनी फडणवीस यांना लगावला.
“राज ठाकरेंच्या भाषणाची स्क्रिप्ट भाजपने लिहून दिलेली”
यावरुन आता भाजपा आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीसांवर स्वप्नदोष झाल्याचा आरोप करत असाल तर शिवसेनेच्या नेत्यांना बुद्धीदोष झाला आहे. या बुद्धीदोषाचे उत्तर ठाण्याला आहे. तिथे संजय राऊत यांनी जाऊन यावे, अशी टीका आशिष शेलार यांनी संजय राऊतांवर केली.
बाबरी मशिदीशी काय संबंध. आंदोलन हे साधू संतानी, हिंदू समाजाने सुरु केल्याचे अख्ख्या जगाला माहिती आहे. तुमचा जन्मच 1960 नंतरचा आहे आणि हे आंदोलन त्याआधी सुरु झाले. जन्म होण्याआधी मी कारसेवेला होतो म्हणणाऱ्यांनी आधी आत्मपरिक्षण करावं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद ही नावं तरी माहिती आहेत का यांना. उगाच श्रेय घेण्याच्या भानडीत ही गडबड करु नका. आज बोलणाऱ्यांनी तोंड बंद करावीत. तुमच्या नावावर साधा गुन्हा दाखल नाही. त्यानंतर झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत तुमचा आईसक्रीम खाण्याचा कार्यक्रम चालू आहे. त्यामुळे तुम्ही त्यांचे समर्थक आहात आणि त्यामुळे याबाबत बोलू नका, असे आशिष शेलार म्हणाले.
“विरोधी पक्षाच्या अंगात जो रावण संचारलाय, त्यांनी त्यांचा अंत करावा”; राऊतांचा फडणवीसांना खोचक टोला
पेट्रोलच्या विषयावर भाजपानेच काम केले आहे. भाजपाच्या सरकारने देशात पेट्रोलच्या करात सवलत दिली आहे. जेव्हा पंतप्रधान मोदींनी याची आठवण करुन दिली, मग त्यावेळी पळ का काढता? स्वतःच्या सरकारला कर कमी करण्यास सांगा. जगामध्ये युद्ध सुरु असतानाही कोणत्याही दबावाला बळी न पडता पंतप्रधानांनी रशियाकडून क्रुड ऑईल घेतले. त्याबद्दल तुम्ही एकतरी वाक्य काढलं का? तुमच्या डोक्यात राजकारणाची घाण आहे ती आधी साफ करा, अशा शब्दात आशिष शेलार यांनी राऊत यांच्यावर टीका केली.
Read also:
- मग राज ठाकरे चैत्यभूमीवर आजवर का नाही गेले? जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना प्रतिसवाल
- अक्षयतृतीयाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका; राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना आदेश
- “नवनीत राणांची तब्येत बिघडली?”; राणांच्या वकिलांचे कारागृह अधिक्षकांना पत्र
- ‘तोंड आम्हालाही आहे.आम्हीही..” राज ठाकरेंना इम्तियाज जलील यांचा इशारा
- “छान आहे, अशीच गुणी मंडळी जोपासा”; मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अमृता फडणवीसांची मिश्किल टिप्पणी
- ‘कालचं भाषण म्हणजे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची मिलीभगत’