सांगली – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये बहुचर्चित सभा पार पडली. या सभेदरम्यान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. यावरून आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.
“भोंगा कमळाला किती त्रास देतोय, ते आगामी काळात दिसेल;” शिवसेनेचा राज ठाकरेंना टोला
शरद पवारांचा द्वेष, त्यांच्याविरोधात बोलणे, अशी स्क्रिप्ट भाजपने राज ठाकरेंना लिहून दिल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. मुंबईत देवेंद्र फडणवीसांचे भाषण संपले आणि तिकडे औरंगाबादमध्ये राज ठाकरे भाषण सुरु झाले. यातूनच फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात अगोदरच काही तरी शिजले असून यावरून दोघांचीही मिलीभगत असल्याचेच सिद्ध होत आहे. यातच शरद पवार यांच्यावर टीका केली की मिडीया कव्हरेज मिळतेच,असा टोलाही पाटील यांनी राज ठाकरेंना लगावला.
राज ठाकरे यांची कालच्या भाषणावेळी अत्यंत केविलवाणी अवस्था झाली होती. देशातल्या वाढत्या महागाईच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी बोलायला हवे, असेही पाटील म्हणाले. शरद पवार यांच्याविरोधात बोलून राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याचा राज ठाकरे प्रयत्न करीत आहेत. मात्र महाराष्ट्रातील हिंदू आणि मुस्लिम हुशार आहेत हे सर्व काही मतांच्या राजकारणासाठी सुरु असल्याचे त्यांना माहिती आहे.
“ईडीची पिडी टाळण्यासाठी अन् भाजपला खुश करण्यासाठी राज ठाकरेंची सभा”; धनंजय मुंडेची खोचक टिप्पणी
तसेच आपल्या भाषणात राज ठाकरे भाजप विरोधात काहीच बोलले नाही. यावेळी ते वाढत्या महागाईचा मुद्दा उपस्थित करू शकत होते. मात्र त्यांनी तसे केले नाही. कारण राज ठाकरेंवर ईडीचा किंवा अन्य कोणाचा दबाव आहे, असा आरोपही पाटील यांनी केला.
Read also:
- “सगळ्यांना पवार साहेबांच्या राजकारणाचा कंटाळा आला”; निलेश राणेंची पवारांवर जहरी टिका
- राज ठाकरेंचं भाषण सुरू असतानाच मशिदीवरील अजाण सुरू झालं; अन् राज भडकले
- “मार्केटिंगचा जमाना भोंगेधारी, पुंगीधारी”; उद्धव ठाकरेंचा भाजप-मनसेवर निशाणा
- “ईडीची पिडी टाळण्यासाठी अन् भाजपला खुश करण्यासाठी राज ठाकरेंची सभा”; धनंजय मुंडेची खोचक टिप्पणी
- भोंगा कमळाला किती त्रास देतोय, ते आगामी काळात दिसेल;” शिवसेनेचा राज ठाकरेंना टोला