मुंबई : राजकीय पुढाऱ्यांनी समाजातील महागाई, गरिबी, रोजगार, शेतकऱ्यांबद्दल बोलले पाहिेजे. परंतु काही नेते हे विषय सोडून विनाकारण चुकीचा इतिहास तरूणांच्या माथी मारून महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा प्रयत्न आम्ही हाणून पाडू, असा इशारा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. राज ठाकरे यांची औरंगाबाद याठिकाणी जोरदार सभा काल झाली. त्या सभेत त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा जोरदार लावून धरला होता.
“विरोधी पक्षाच्या अंगात जो रावण संचारलाय, त्यांनी त्यांचा अंत करावा”; राऊतांचा फडणवीसांना खोचक टोला
महाराष्ट्रात जाणीवपूर्वक अपप्रचार करून महाराष्ट्र पेटवण्याचे कारस्थान काही लोक करत आहेत. असा घणाघात देखील त्यांनी केला. पुरंदरेंच्या साहित्याला ज्ञानपीठ का नाही मिळाला? किंवा ऐतिहासिक लिखाणाबद्दल त्यांना एकाही विद्यापीठाने डॉक्टरेट का नाही दिली? असा सवाल देखील त्यांनी केला आहे. तरूणांमध्ये चुकीचा इतिहास जात आहे. राज ठाकरे पवार साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले नाही, परंतु चैत्यभूमीपासून अगदी जवळ राहत असूनही राज ठाकरे चैत्यभूमीवर आजवर का नाही गेले? असा प्रतिप्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला.
“सगळ्यांना पवार साहेबांच्या राजकारणाचा कंटाळा आला”; निलेश राणेंची पवारांवर जहरी टिका
छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध आणि त्याचे पुर्ण बांधकाम याबाबतचे सगळे ऐतिहासिक कागदपत्र उपलब्ध आहेत. त्यावरून हे सिद्ध होते की लोकमान्य टिळकांनी समाधी बांधण्यासाठी समिती स्थापन केली होती. पैसेही जमा केले होते पंरतु त्यांनी जीर्णोद्धार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार 1926 साली ब्रिटिशांनी शिवाजी स्मारक जीर्णोद्धार समिती ह्या दोघांनी मिळून केला.
राज ठाकरेंचं भाषण सुरू असतानाच मशिदीवरील अजाण सुरू झालं; अन् राज भडकले
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही खरी संभाजी महाराज यांनी बांधून ठेवली होती. परंतु ती नंतर दुर्लक्षित करण्यात आली. पत्र व्यवस्थित वाचा. देव कणाकणात आहे त्याची चर्चा सोडा. लोकशाहीच्या मंदिरातील जनता जनार्दन नावाच्या देवाची चिंता करा. ह्या देवाचा श्वास कोंडला आहे परिस्थितीमुले महागाईचा डोंगर त्या देवावर कोसळला आहे. असंही ते म्हणालेत.
Read also:
- प्रशांत किशोर यांची राजकारणात एंट्री, काढणार स्वत:चा पक्ष…!
- “महागाई अन् बेरोजगारीचं अपयश लपवण्यासाठी भाजपची राज ठाकरेंना सुपारी”; पटोलेंची भाजपवर खरमरीत टिका
- “नवनीत राणांची तब्येत बिघडली?”; राणांच्या वकिलांचे कारागृह अधिक्षकांना पत्र
- “छान आहे, अशीच गुणी मंडळी जोपासा”; मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अमृता फडणवीसांची मिश्किल टिप्पणी
- ‘कालचं भाषण म्हणजे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची मिलीभगत’