मुंबई : असह्य झालेली महागाई आणि बेरोजगारीवरून लक्ष उडवून मोदी सरकारचं अपयश लपविण्यासाठी भाजपने राज ठाकरे यांना सुपारी दिली आहे. परंतु या सुपारीबाजाला जनता ओळखून आहे, त्याचा कोणताही परिणाम होणार नाही, असा घणाघात काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज ठाकरे यांच्यावर लावला. काल औरंगाबाद येथे मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर राज ठाकरे यांची दमदार सभा पार पाडली. त्यावेळी त्यांनी राज्य सरकार विरोधात जोरदार टिका केली होती.
राज ठाकरेंचं भाषण सुरू असतानाच मशिदीवरील अजाण सुरू झालं; अन् राज भडकले
नाना पटोले पुढे म्हणाले, वीज, गॅस उत्पादन, पाणी पुरवठा, व्यापार हॉटेल्स, वाहतुक प्रसारणाशी संबंधित संवाद सेवा या क्षेत्रांची मोदी सरकारच्या काळात पार वाताहत झाल्याचे रिझर्व्ह बॅंकेच्या अहवालात म्हटले आहे. केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे भारताची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी बारा वर्ष लागणार आहेत. मोदीजी आणखी किती माहगाई आणि बेरोजगारी वाढविणार? असा सवाल देखील नाना पटोले यांनी भाजपला केला आहे.
“मार्केटिंगचा जमाना भोंगेधारी, पुंगीधारी”; उद्धव ठाकरेंचा भाजप-मनसेवर निशाणा
केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्रातून सर्वाधिक जीएसटीची वसुली करते. पण महाराष्ट्राला मदत करण्याच्या नावावर सतत राजकारण करीत असते. राहुल गांधी नोटाबंदी, चुकीचा जीएसटी, चीन आणि बेरोजगारीच्या मुद्यांवर राहुल गांधींचे भाष्य खरे ठरले. महागाई आणि ढासळत्या अर्थव्यवस्थेविषयीची त्यांची भीती अगदी रास्त आहे. महाराष्ट्र सरकारने सीएनजीवरील वॅट १३.५ टक्क्यांवरुन घटवून ३ टक्क्यांवर आणला. पण केंद्रातील भाजप सरकारने याच काळात सीएनजीच्या दरात ३० रुपयांनी वाढ करुन जनतेला मिळणाऱ्या दिलाशाच्या मार्गात अडथळा आणला. असंही ते म्हणाले.
“ईडीची पिडी टाळण्यासाठी अन् भाजपला खुश करण्यासाठी राज ठाकरेंची सभा”; धनंजय मुंडेची खोचक टिप्पणी
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल औरंगाबाद येथे रिज गर्जना करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टिकास्त्र सोडलं. त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीवर प्रहार करत राज्यात राष्ट्रवादीमुळे जातीयवाद वाढला असल्याचं वक्तव्य केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून येण्यासाठी शरद पवारांनी राज्यात जातीय विष पेरलं असल्याची टीका देखील केली.
Read also:
- “नवनीत राणांची तब्येत बिघडली?”; राणांच्या वकिलांचे कारागृह अधिक्षकांना पत्र
- “छान आहे, अशीच गुणी मंडळी जोपासा”; मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अमृता फडणवीसांची मिश्किल टिप्पणी
- ‘कालचं भाषण म्हणजे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची मिलीभगत’
- “विरोधी पक्षाच्या अंगात जो रावण संचारलाय, त्यांनी त्यांचा अंत करावा”; राऊतांचा फडणवीसांना खोचक टोला
- “सगळ्यांना पवार साहेबांच्या राजकारणाचा कंटाळा आला”; निलेश राणेंची पवारांवर जहरी टिका