मुंबई – ‘तोंड आम्हालाही आहे. राज ठाकरे ज्या अविर्भावात बोलतील त्याच अंदाजात आम्हीही प्रत्युत्तर देऊ शकतो. आम्हीही जशास तसं प्रत्युत्तर देऊ शकतो, पण कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे निर्णय घ्यायला हवा.” अशी प्रतिक्रिया औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेतही मशिदींवरील भोंगे हटवण्याच्या भूमिकेवर ठाम राहत जाहीर इशाराच दिला. औरंगाबादेतील भाषणावरून राज यांच्यावर विरोधकांकडून टीका होऊ लागली आहे. राज यांनी काल मांडलेल्या भूमिकेवर खासदार इम्तियाज जलील यांच्यावर निशाणा साधला.
हनुमान चालिसा म्हटल्याने रामाचं राज्य उलटलं जाईल की रावणाचं ? फडणवीसांचा ठाकरेंना सवाल
चिथावणखोर विधानं करायची नाहीत, लाऊडस्पीकरचा आवाज कमी ठेवायचा, अशा अनेक अटी पोलिसांनी राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देताना घातल्या होत्या. पण राज ठाकरेंनी सगळ्याच अटींचं उल्लंघन केलं. आता पोलीस त्यांच्यावर काय कारवाई करणार, असा सवाल जलील यांनी उपस्थित केला. आम्ही अशी विधानं केली असती, तर लगेच आमच्याविरोधात गुन्हे दाखल झाले असते, मग राज यांच्यावरही गुन्हा दाखल होणार का, असा सवालही जलील यांनी विचारला.
राज ठाकरे यांच्या औरंगाबादेतील सभेकडे केवळ महाराष्ट्राचेच नाही, तर देशाचे लक्ष लागले होते. तुडुंब भरलेल्या गर्दीसमोर भाषण करतांना राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस, शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. भाषणातील बहुतांश वेळ त्यांनी राष्ट्रवादीमुळे सुरू झालेले जातीपातीचे राजकारण यावर प्रहार करतांनाच राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्या संदर्भात चार तारखेनंतर ऐकणार नसल्याचा इशारा राज्य सरकारला दिला. गुडीपाडव्याच्या सभेत पहिल्यांदा राज ठाकरे यांनी भोंग्याचा मुद्या उपस्थित केला.
परंतु याच सभेत त्यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडल्याचा आरोप करत टीका केली होती. ठाण्याच्या सभेत देखील त्यांनी शिवसेनेला लक्ष्य केले होते. औरंगाबादच्या सभेत मात्र राज ठाकरे यांनी शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्याबद्दल भ्र शब्द देखील काढला नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
Read also:
- ‘कालचं भाषण म्हणजे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची मिलीभगत’
- “विरोधी पक्षाच्या अंगात जो रावण संचारलाय, त्यांनी त्यांचा अंत करावा”; राऊतांचा फडणवीसांना खोचक टोला
- “सगळ्यांना पवार साहेबांच्या राजकारणाचा कंटाळा आला”; निलेश राणेंची पवारांवर जहरी टिका
- राज ठाकरेंचं भाषण सुरू असतानाच मशिदीवरील अजाण सुरू झालं; अन् राज भडकले
- “मार्केटिंगचा जमाना भोंगेधारी, पुंगीधारी”; उद्धव ठाकरेंचा भाजप-मनसेवर निशाणा
- “ईडीची पिडी टाळण्यासाठी अन् भाजपला खुश करण्यासाठी राज ठाकरेंची सभा”; धनंजय मुंडेची खोचक टिप्पणी