मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद याठिकाणी जोरदार सभा पाडली. त्यांनी यावेळी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा मांडत राष्ट्रवादी काॅंग्रेसवर जोरदार टिका केली. तसेच मशिदीवरील भोंग्यासंदर्भातील भूमिकेवरही ते ठाम राहिले. अशातच मशिदीवरील भोंगे खाली उतरवण्याचा दिलेला अल्टिमेटमही त्यांनी आठवण करून दिला. यातच आता ठरल्याप्रमाणे अक्षयतृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करणार नसल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
“सगळ्यांना पवार साहेबांच्या राजकारणाचा कंटाळा आला”; निलेश राणेंची पवारांवर जहरी टिका
राज ठाकरे यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, उद्दा ईद आहे. कालच्या संभाजीनगरच्या सभेत त्याबाबतीत मी बोललो आहेच. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षयतृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका, आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणयची नाही. भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण पुढे नेमकं काय करायचं; हे मी उद्दया माझ्या ट्विटद्वारे आपल्यासमोर मांडेन, असंही त्यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरेंचं भाषण सुरू असतानाच मशिदीवरील अजाण सुरू झालं; अन् राज भडकले
राज ठाकरे यांनी काल पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्यांंसंदर्भात वक्तव्य केलं. मशिदीवरील भोंगे हटवले नाही तर त्याच्या पुढे मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावण्यात येईल, असा सज्जड दम देखील त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. मात्र गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्य सरकार निर्णय घेईल असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पुढील दिवसात राज्यात राजकीय वातावरण कोणत्या दिशेने जाईल ते पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
“मार्केटिंगचा जमाना भोंगेधारी, पुंगीधारी”; उद्धव ठाकरेंचा भाजप-मनसेवर निशाणा
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल औरंगाबाद येथे रिज गर्जना करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टिकास्त्र सोडलं. त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीवर प्रहार करत राज्यात राष्ट्रवादीमुळे जातीयवाद वाढला असल्याचं वक्तव्य केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून येण्यासाठी शरद पवारांनी राज्यात जातीय विष पेरलं असल्याची टीका देखील केली.
Read also:
- “महागाई अन् बेरोजगारीचं अपयश लपवण्यासाठी भाजपची राज ठाकरेंना सुपारी”; पटोलेंची भाजपवर खरमरीत टिका
- “नवनीत राणांची तब्येत बिघडली?”; राणांच्या वकिलांचे कारागृह अधिक्षकांना पत्र
- “छान आहे, अशीच गुणी मंडळी जोपासा”; मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अमृता फडणवीसांची मिश्किल टिप्पणी
- ‘कालचं भाषण म्हणजे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची मिलीभगत’
- “विरोधी पक्षाच्या अंगात जो रावण संचारलाय, त्यांनी त्यांचा अंत करावा”; राऊतांचा फडणवीसांना खोचक टोला