अमरावती: शेतकऱ्यांकडून वीज बिल वसुली करताना सहानुभूतीचा दृष्टिकोन ठेवा. इंग्रजांसारखे वागू नका, असा सज्जड इशारा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. शुक्रवारी अमरावती वीज विभागातील अधिकाऱ्यांच्या विविध विभागांची आढावा बैठक पार पडली. यावेळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना देत कानउघाडणीही पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केली.
हे पण वाचा: काँग्रेसवर होणाऱ्या टीकेला स्वातंत्र्य वारशाची गाथा सांगत प्रत्युत्तर देऊ – नाना पटोले
अमरावतीतील शेतकऱ्यांकडून वीज बिल वसुली करताना सर्व रक्कम घेण्याचा तगादा अधिकाऱ्यांकडून लावला जातो. पैसे न दिल्यास शेतकऱ्यांची वीज जोडणी कापली जाते, अशा अनेक तक्रारी पालकमंत्री ठाकूर यांच्याकडे आल्या होत्या. याचा पाठपुरावा त्यांनी केला. सततच्या पावसामुळे पूर आला. या पावसात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यामुळे ते हवालदिल झाले आहेत, असेही यशोमती ठाकूर म्हणाल्या.
हे पण वाचा: अजित पवारांविरोधात सक्षम उमेदवार देऊ; चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा
पुरामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, ते आर्थिक अडचणीत आहेत. अशावेळी त्यांना पैशांसाठी त्रास देऊ नका. शेतकऱ्यांकडे जी रक्कम असेल ती घ्या. पैशासाठी तगादा लावून वीज कापू नका. ऊर्जा विभागावर ताण येत आहे, याची माहिती आहे. मात्र, वीज बिल वसुली करताना शेतकऱ्यांसोबत इंग्रजांसारखे वागू नका. शक्य तितक्या नम्रतेने वागा, अशी सूचना यशोमती ठाकूर यांनी वीज विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या.
हे पण वाचा: पंतप्रधान रोजगार योजनेतील ८८ टक्के उद्योगांना कोरोनाचा फटका – नारायण राणे
सद्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे. शेतातील पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. अशावेळी कोणीही शेतकऱ्यांची वीज कापणार नाही. वीज कापली तर गोंधळ होईल. हे मुळीच खपवून घेणार नाही. कोणीही शेतकऱ्यांवर पैशांसाठी दबाव टाकणार नाही. शेतकऱ्यांसोबत नम्रतेने वागा. जे देईल, जितके देईल तितकेच पैसे द्या. नंतर पुन्हा पैसे घ्या. परंतु, दबाव टाकू नका, असेही पालकमंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या.
Read Also :
- हेरगिरीच्या आरोपावरुन संसदेत संपूर्ण आठवडा उलटूनही गदारोळ कायम, विरोधक आक्रमक
- मी अपघाताने दिल्लीत आलो, प्रथम महाराष्ट्रातील प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देईल, नितीन गडकरी यांचा शब्द
- काँग्रेसवर होणाऱ्या टीकेला स्वातंत्र्य वारशाची गाथा सांगत प्रत्युत्तर देऊ – नाना पटोले
- अजित पवारांविरोधात सक्षम उमेदवार देऊ; चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा
- पंतप्रधान रोजगार योजनेतील ८८ टक्के उद्योगांना कोरोनाचा फटका – नारायण राणे