मुंबई: भाजपकडून वारंवार काँग्रेसवर होणाऱ्या टीकेला काँग्रेसकडून स्वातंत्र्य वारशाची गाथा सांगत प्रत्युत्तर दिले जाणार आहे. या राज्यव्यापी मोहिमेची सुरुवात १ ऑगस्टला टिळकवाड्यातून होणार आहे. प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यावेळी उपस्थित असतील प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड व विनायक देशमुख या मोहिमेचे राज्य समन्वयक आहेत. १५ ऑगस्ट व त्यानंतर पुढे वर्षभर ही मोहीम राज्यात राबविण्यात येणार आहे. ‘व्यर्थ न हो बलिदान’ असे मोहिमेचे नामकरण करण्यात आले आहे.
हे पण वाचा: दणका! ईडीचे अनिल देशमुखांना चौथे समन्स, न्यायालयानेही फेटाळली अटक न करण्याची याचिका
पटोले यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले काँग्रेस नेहरू-गांधी परिवार यावर जी प्रचंड टीका केली जात आहे त्याला जनता उत्तर देईल. आमचा उद्देश नव्या पिढीसमोर काँग्रेसचा स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग स्वातंत्र्योत्तर काळात देश उभारणीतील असे असलेले काँग्रेसचे काँग्रेस नेत्यांची योगदान याचा इतिहास मांडायचा आहे.
हे पण वाचा: तळीयेसाठी दुःखात सुखाची छोटी फुंकर! पुनर्वसनाची जागा झाली निश्चित
मोहिमेचा प्रारंभ करताना पुण्यातील काँग्रेसच्या जुन्या वारसाच्या वारसांना बोलवण्यात येणार आहे . राज्यातील पंधरा हजारापेक्षा जास्त स्वातंत्र्य सैनिकांची नावे पत्ते तालुकानिहाय वेगळे करण्यात आले आहेत. पक्षाचे तालुकाध्यक्ष तेथे जाऊन त्यांचा गौरव करती, स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात काँग्रेसचे फैजलपूर अधिवेशन आष्टीचा चिमूरचा लढा नंदुरबारच्या शिष्कुमारची बलिदान अशा वैशिष्ट्यपूर्ण घटना या ठिकाणी आहेत.
हे पण वाचा: मोदींच्या सांगण्यावरून दिल्लीत खलबतं, गडकरींनी पवारांची भेट घेऊन केली महत्त्वाच्या विषयावर चर्चा
राज्यात अशा सहा ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत. स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित छायाचित्र प्रदर्शन आयोजित होणार आहेत. स्वतंत्र दिनापर्यंत चळवळीचा इतिहास व त्यानंतर पुढे वर्षभर स्वातंत्र्यानंतरची देश उभारणी अशा दोन सत्रात मोहिमेची रचना आहे. अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे.
Read Also :
- अजित पवारांविरोधात सक्षम उमेदवार देऊ; चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा
- पंतप्रधान रोजगार योजनेतील ८८ टक्के उद्योगांना कोरोनाचा फटका – नारायण राणे
- परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ: साडेतीन कोटींच्या खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल
- राणेंचं तोंड बंद करण्याची ताकद प्रत्येक शिवसैनिकात, नारायण राणेंच्या टीकेला शिवसेनेच प्रत्युत्तर
- शेकापचे ज्येष्ठ नेते ‘विधानसभेचे विद्यापीठ’ गणपतराव देशमुख अनंतात विलीन