मुंबई: देशात मागील दीड वर्षांपासून कोरोना थैमान घातले आहे, यामध्ये अनेंक लोकांच्या नोकऱ्या गेल्या तसेच काहीचे उद्योग डबगाईला आले आहेत. देशात सर्वांत जास्त प्रणात कोरोनाचा फटका हा व्यापाऱ्याना बसला आहे. कोरोना महामारी मुळे लावण्यात आलेल्या लॅाकडाऊनमुळे लोकांमुळे सूक्ष्म लघु आणि मध्यम क्षेत्रातील कंपन्या विपरीत परिणाम झाला होता. या महामारी चा पंतप्रधान रोजगार निर्मिती उपक्रमातील ८८ टक्के उद्योगांवर विपरीत परिणाम झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लोकसभेत दिली.
हे पण वाचा: दणका! ईडीचे अनिल देशमुखांना चौथे समन्स, न्यायालयानेही फेटाळली अटक न करण्याची याचिका
एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात नारायण राणे यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की राष्ट्रीय सूक्ष्म लघु आयोग आणि खादी ग्रामोद्योग आयोगाकडून सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात पंतप्रधान रोजगार निर्मिती उपक्रमातील उद्योगांचा आढावा घेण्यात आला. या उपक्रमांना रोख निधी नव्या ऑर्डर्स मनुष्यबळ लॉजिस्टिक आणि कच्चा मालाच्या पुरवठ्याबाबत अडचणी निर्माण झाल्याचे हे दिसून आले. बहुतांश उद्योग महामारीच्या काळात बंद होते. त्यामुळे व्यवसाय ठप्प होता, परिणामी कर्मचाऱ्यांना पगार देण्यात अडचणी निर्माण झाल्या. जीवनावश्यक वस्तूशी संबंधित उद्योगांना लाभ झाल्याचे दिसून आले.
हे पण वाचा: कायम पुराचा धोका असणाऱ्या गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावू – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
कोरोना नंतर या क्षेत्रात मदतीसाठी केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत अनेक योजना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार ५० हजार कोटींची अतिरिक्त निधी आणि २० हजार कोटी रुपयांचे दुय्यम कर्ज देण्यात येणार आहे. तसेच दोनशे कोटी रुपयांपर्यंतची निविदांमध्ये केवळ स्वदेशी उद्योगांनाच सहभाग सहभागी होता येणार आहे. यावेळी नारायण राणे म्हणाले.
हे पण वाचा: तळीयेसाठी दुःखात सुखाची छोटी फुंकर! पुनर्वसनाची जागा झाली निश्चित
सर्वेक्षणातील निकषानुसार
देशातील ८८ टक्के उद्योगांना कोरोना महामारी फटका बसला, तर १२टक्के उद्योगांना लाभ ५७ टक्के उद्योग महामारी च्या काळात अनेक दिवस बंद होती ८४ टक्के उद्योगांना पगार देण्यामध्ये अडचणी आल्या बहुतांशी उद्योगांना व्याजमाफी तसेच अतिरिक्त आर्थिक मदतीची गरज नारायण राणे यांनी यावेळी व्यक्त केली.
Read Also :
- परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ: साडेतीन कोटींच्या खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल
- राणेंचं तोंड बंद करण्याची ताकद प्रत्येक शिवसैनिकात, नारायण राणेंच्या टीकेला शिवसेनेच प्रत्युत्तर
- शेकापचे ज्येष्ठ नेते ‘विधानसभेचे विद्यापीठ’ गणपतराव देशमुख अनंतात विलीन
- तळीयेसाठी दुःखात सुखाची छोटी फुंकर! पुनर्वसनाची जागा झाली निश्चित
- जेव्हा गरज असेल तेव्हा केंद्राची मदत घेऊ, मात्र वेड्यावाकड्या मागण्या करून पॅकेज जाहीर करणार नाही!