महाड : रायगडमधील महाड जिल्ह्यातील तळीये गावात, अतिवृष्टीने डोंगर कोसळून झालेल्या दुर्घटनेत ५३ जणांचा मृत्यू झाला, तर ३१ अजूनही बेपत्ता आहेत. दरम्यान, पावसाच्या प्रकोपांनंतर आता तळिये गाव, या धक्क्यातून सावरत असून, त्यांच्या मोठ्या दुःखात एक सुखाची फुंकर घालणारी घटना घडली आहे.
दिल्लीत भेटले गडकरी-पवार, मोदींच्या सांगण्यावरून झाली “या” विषयावर चर्चा
तळीये दुर्घटनाग्रस्तांचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने शासनाकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर, आता गावकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी जागा निश्चित करण्यात आली असून, दुर्घटनाग्रस्तांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत देण्यात येत आहे. तळीयेचे कोतवाल बाळा कोंढाळकर यांनी याबाबतची माहिती दिली.
जेव्हा गरज असेल तेव्हा केंद्राची मदत घेऊ, मात्र वेड्यावाकड्या मागण्या करून पॅकेज जाहीर करणार नाही!
“तळीये गावातील दुर्घटनाग्रस्तांचे पुनर्वसन होणार असून, त्यासाठी आता जागा निश्चित करण्यात आली आहे. याबाबतची जागा संमती मालकानं दिली; की या दुर्घटनाग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा होणार आहे. गावातल्या गावातच त्यांचे पुनर्वसन केले जाणार असून, सर्व्हे नंबर १२५-१५ गट ही जागा त्यासाठी निश्चित करण्यात आली आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.
फडणवीस-ठाकरे आले पुन्हा एकत्र, अवघ्या ५ मिनिटांच्या चर्चेत दडलंय तरी काय?
तसेच, “मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून प्रत्येकी २ लाखांची मदत, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे पीक विमा योजनेतून देण्यात येत आहे. सध्या या मृत शेतकऱ्यांचे सातबारे गोळा करण्यात आले असून, येत्या आठवड्यात ही कागदपत्रे सादर करून, २ दिवसात कृषी पंचनामे होणार आहेत. त्यानंतर ही मदत त्यांच्या संबंधितांच्या खात्यात पोहोचवली जाईल,” असं मंडल कृषी अधिकारी भाऊसाहेब गावडेंनी सांगितलं.
कायम पुराचा धोका असणाऱ्या गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावू – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
दरम्यान, दरवर्षीच्या पावसाळ्यात अश्या प्रकारच्या घटना घडण्याची वारंवारता वाढू लागली असून, सरकारने या घटना घडू नयेत म्हणून ठोस आणि भक्कम पावलं उचलणं गरजेचं आहे. पुराची भीषणता देखील वर्षागणिक वाढू लागली असून, त्याबाबत देखील सरकारने येत्या काळाची गरज ओळखून, गंभीर धोरणे आणि उपाययोजना आखून, त्यांची तातडीने अंमलबजाबवणी करणे अतिशय गरजेचे आहे. मात्र कोणतेही सरकार याकडे गांभीर्याने पाहताना दिसून येत नाहीये आणि नागरिकांचे हकनाक जीव जात आहेत.
Read Also :
- फडणवीस सरकारची चुक अजितदादांनी निस्सारली, २३ गावांच्या निर्णयाचे स्वागतच – प्रशांत जगताप
- पंकजांसोबत आजही बहिणीसारखं नातं; फडणवीसांच्या विधानावर, पंकजा मुंडे म्हणतात…
- ‘’मुख्यमंत्री बाळासाहेबांचे वंशज, आमचं म्हणणं जरुर ऐकतील’’, कोल्हापूरकरांची आर्त हाक
- फोन टॅपिंग: ‘रश्मी शुक्ला यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली होती का?’
- मोठी बातमी: राजकीय हालचालींना वेग, प्रशांत किशोर बनणार सोनिया गांधींचे सल्लागार?