मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यामधील सुप्त संघर्ष सर्वांना परिचित आहे. भाजपमधील अंतर्गत वाद अनेकदा पाहायला मिळाला आहे. काही दिवसांपूर्वीच पंकजा यांनी त्यांची खासदार बहिण प्रितम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद न मिळाल्यानंतर काहीसा नाराजीचा सूर लावला. गेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा बीडमध्ये पराभव केला. या पराभवानंतर मुंडे आणि फडणवीस यांच्यातील संघर्ष आणखी वाढला.
हे पण वाचा: मनी लाँड्रिंग प्रकरणी: अनिल देशमुखांच्या संरक्षण मिळण्याच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी
मी गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत घडलो. मुंडे कुटुंबाशी माझं भावनिक नातं आहे. आजही ते नातं कायम आहे. त्यात तसूभरही फरक पडलेला नाही. हे नातं राजकारणापलिकडचं आहे. त्यात काहीच कमी अधिक होत नाही. आम्ही पूर्वी बहीण-भावाप्रमाणे महाराष्ट्रात फिरायचो. आजही आमचं हे नातं कायम आहे, असं फडणवीस म्हणाले.
विशेष म्हणजे मुंडे भगिनी नाराज असल्याच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी हे विधान केलं आहे. त्यातही पंकजा मुंडे आणि फडणवीस यांच्यात बेबनाव असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळेही फडणवीसांचं हे विधान अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे. पंकजा यांनी वरळीत त्यांच्या घरासमोर समर्थकांशी संबोधताना दिल्लीतील नेत्यांची नाव घेतली होती. दिल्लीतील नेते आपले नेते असल्याचं म्हटलं होतं. पण महाराष्ट्रातील भाजपच्या एकाही नेत्याचं नाव घेतलं नव्हतं. किंबहुना फडणवीसांचं नावही घेतलं नव्हतं. त्यामुळे राज्यातील नेतृत्वावर पंकजा नाराज असल्याचं बोललं जात आहे.
हे पण वाचा: आजचे क्षण म्हणजे भारावून टाकणारे, आणि ऊर्जा देणारे; पंकजा मुंडे म्हणतात….
देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर पंकजा यांनी अतिशय मोजकी प्रतिक्रिया दिली. पंकजा मुंडे नाराज नाहीत. त्यांचे कार्यकर्ते नाराज होते. त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न पंकजा करत आहेत. त्यांच्यासोबत बहिणीसारखं नातं आहे, असं फडणवीसांनी म्हटलं आहे. या विधानाबद्दल तुम्हाला काय वाटतं, असा प्रश्न पंकजांना विचारण्यात आला. त्यावर ‘चांगलंय. त्यांनी दिलेलं उत्तर तुमच्यासाठी समाधानकारक असेल अशी माझी अपेक्षा आहे,’ अशी त्रोटक प्रतिक्रिया पंकजा यांनी दिली.
Read Also :
- ‘’मुख्यमंत्री बाळासाहेबांचे वंशज, आमचं म्हणणं जरुर ऐकतील’’, कोल्हापूरकरांची आर्त हाक
- राष्ट्रवादी रिलीफ फंडाच्यावतीने कोकणातील पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत
- आपलाच पेपर अन् आपलीच जाहिरात; ८८ पानी पेपर छापून सामनाने मुख्यमंत्र्याच्या आवाहनाला दाखवली केराची टोपली
- मोठी बातमी: राजकीय हालचालींना वेग, प्रशांत किशोर बनणार सोनिया गांधींचे सल्लागार?
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर; पूरग्रस्त भागाची करणार पाहणी!