मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख असलेले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणतात वाढदिवस साजरा करु नका, जाहिरताबाजी, बॅनरबाजी करू नका, कोकणला मदत करा, असे आवाहन केले होते. मात्र या आवाहनाचा पदाधिकाऱ्यांबरोबरच खुद्द दैनिक सामनालाच विसर पडला आहे. कारण सामनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेशाला केराची टोपली दाखवत तब्बल ८८ पानी पेपर छापून मोठी जाहिरातबाजी केली आहे. त्यामुळे आपलाच पेपर अन् आपलीच जाहिरात, अशी गत शिवसेनेची झाली असल्याच्या चर्चांना उधान आले आहे.
पुण्यातील होर्डींग युद्ध सुरूच; भाजप- राष्ट्रवादीनंतर आता शिवसेनेची चमकोगिरी
“कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला आहे. पूरामुळे मृत्यू झाले आहेत. अनेकांच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. या आपत्तीत महाराष्ट्र शोकाकुल आहे. त्यामुळे कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये,” असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. “वाढदिवसानिमित्त कुणीही अभिष्टचिंतन करण्यासाठी प्रत्यक्ष भेटू नये. तसेच फलक, पोस्टर्स लावू नये. सोशल मीडिया व ईमेलच्या माध्यमातून आपण शुभेच्छा स्वीकारू,” असं आवाहनही त्यांनी केलं होत. मात्र या सर्व आवाहनाला सामनाने हारताळ फासले आहे.
पुणे महापालिकेचा भोंगळ कारभार: मुसळधार पावसात पर्जन्यमापक यंत्रणा बंदच
सामनाने त्यांच्याच मुखपत्र असलेल्या दैनिकात ८८ पानी पेपर छापला आहे. त्यामध्ये १६ पाने मुख्य पेपर, त्यात ही वाढदिवसाच्या जाहिरातीच जास्त, आणि ७२ पाने जाहिरातींच्या पुरवण्या. जवळपास ८० पाने ही फक्त जाहिरातींवर खर्च केलेली आहेत. यातून मुखपत्राला लाखो रुपये मिळाले असतील. त्यामध्ये दुमत नाही. मग वाढदिवस साजरा करु नका कोकणला मदत करा म्हणणाऱ्या पक्षप्रमुखाला विचारावेसे वाटते की यातून कोकणाला काय मदत होणार आहे? कथनी आणि करनीतला हा फरक म्हणजे कोकणची क्रूर चेष्टाच?, असे अनेक प्रश्न आता कोकणातील जनता विचारू लागली आहे.
Read Also :
- मोठी बातमी: राजकीय हालचालींना वेग, प्रशांत किशोर बनणार सोनिया गांधींचे सल्लागार?
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर; पूरग्रस्त भागाची करणार पाहणी!
- मनी लाँड्रिंग प्रकरणी: अनिल देशमुखांच्या संरक्षण मिळण्याच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी
- पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी ‘एनटीए’कडून जेईई परीक्षा प्रवेशपत्रे जारी; ३ व ४ ऑगस्ट रोजी होणार परीक्षा
- आजचे क्षण म्हणजे भारावून टाकणारे, आणि ऊर्जा देणारे; पंकजा मुंडे म्हणतात….