मुंबई: कोरोनाच्या भयाण संकटानंतर सध्या महाराष्ट्रावर महापुराचे संकट ओढावले आहे. गेल्या आठवड्यात पावसाने थैमान घातल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यातील काही भागात मोठं नुकसान झाले आहे.
हे पण वाचा: “मुख्यमंत्री जिथे कोयनेला पोहोचू शकत नाहीत, तिथे ते दिल्लीला काय पोचणार?”, मनसेकडून बोचरी टीका
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोल्हापूरातील पूरग्रस्त भागांचा पाहणी दौरा करणार आहेत. यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरचा पाहणी दौरा करत स्थानिक पातळीरवर पूरस्थितीचा मुकाबला करण्यासाठी उपाययोजनांसंदर्भात घोषणा केली. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा दौरा कोल्हापूर पुरग्रस्तांसाठी महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी कोणती मदत जाहीर करतील? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
हे पण वाचा: “पर्यावरणमंत्री म्हणून तुम्ही काय केलंत?” संतप्त चिपळूणकरांनी विचारला आदित्य ठाकरेंना जाब
असा असेल मुख्यमंत्र्यांचा दौरा?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी १० वाजता कोल्हापूरमध्ये दाखल होणार, त्यानंतर ११.२० वाजता शिरोळ नरसिंह वाडी येथे मोटारीने आगमन करतील त्यानंतर येथेली पूर परिस्थीची पाहणी करुन, मुख्यमंत्र्याचा ताफा दुपारी १ .०० वाजता कोल्हापूर ६वी गल्ली नाईक अँड कंपनी या ठिकाणी आगमन व पुरामुळे बाधित भागाची पाहणी करणार, त्यानंतर १.१५ मिनीटांनी पंचगंगा हॉस्पिटल गंगावेश ते शिवाजी पूल रस्ता येथे पुरामुळे बाधित भागाची पाहणी करणार, तसेच २.०० वाजता ते कोल्हापूर शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा प्रशासनासमवेत आढावा बैठक व त्यानंतर पत्रकार परिषद घेणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा असा असणार आहे आजचा कोल्हापूर दौरा.
हे पण वाचा: “केंद्राने जाहीर केलेल्या निधीचा आणि सध्याच्या पुराचा काहीही संबंध नाही” अजित पवारांचा पंचनामा
तीन दिवसांपूर्वी दौरा झाला होता रद्द!
तीन दिवसांपूर्वी म्हणजेच २६ जुलै रोजी मुख्यमंत्री पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी दौरा करणार होते. रायगडमधील तळीये आणि चिपळूणची पाहणी केल्यानंतर ते सातारा, कोल्हापूरची हवाई पाहणी करणार होते. मात्र, खराब हवामानामुळे त्यांचं हेलिकॉप्टर लँड होऊ शकलं नाही. त्यामुळे त्यांचं हेलिकॉप्टर साताऱ्यात न उतरता पुण्याला माघारी गेलं.
Read Also :
- मनी लाँड्रिंग प्रकरणी: अनिल देशमुखांच्या संरक्षण मिळण्याच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी
- पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी ‘एनटीए’कडून जेईई परीक्षा प्रवेशपत्रे जारी; ३ व ४ ऑगस्ट रोजी होणार परीक्षा
- आजचे क्षण म्हणजे भारावून टाकणारे, आणि ऊर्जा देणारे; पंकजा मुंडे म्हणतात….
- राष्ट्रवादी रिलीफ फंडाच्यावतीने कोकणातील पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत
- पुणे मेट्रोची वनाज ते आयडियल कॉलनी ‘ट्रायल रन’? अजित पवारांच्या हस्ते मिळणार हिरवा झेंडा