चिपळूण : पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, आज चिपळूणच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला आणि सध्या त्यांना असणाऱ्या समस्यांची माहिती घेतली. दरम्यान, यावेळी तुम्ही पर्यावरणमंत्री आहात, कोकणात काय चाललंय याची माहिती तुम्हाला आहे का?, ते तुम्ही पाहिलं आहे का?, तुम्ही कधीतरी येता, महिन्यातून एक फेरी तरी होते का तुमची? अशी विचारणा उध्वस्त आणि संतप्त चिपळूणकरांनी त्यांना केली.
अखेर पूरग्रस्तांच्या खात्यात यादिवशी जमा होणार १० हजारांची मदत, वडेट्टीवारांनी केली मोठी घोषणा
त्यांनी आज पाहणी करून झाल्यावर प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी, “पंचनामे झाल्यावर पूरग्रस्तांना भरीव आर्थिक मदत केली जाईल. सध्या पूरग्रस्तांचं बचावकार्य संपलं आहे, आता मदतकार्याला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी पक्षाचे आमदार, खासदार, जिल्हाधिकारी आणि अन्य अधिकारी, एनडीआरएफ, एसडीआरएफ, सेवाभावी संस्था यांनी रेस्क्यूमध्ये चांगलं काम केलं. आता पुराचं पाणी ओसरायला लागलं आहे. त्यामुळे शासनाकडून मदत देखील सुरु करण्यात आली आहे,” असे त्यांनी सांगितले.
मोठी बातमी : २५ जिल्ह्यात निर्बंध शिथिल होणार, ११ जिल्ह्यांमध्ये मात्र लेव्हल तीनचे नियम कायम
तसेच, “सध्याचा काळ आणि ही वेळ पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन कोकणवासीयांच्या पाठीमागे उभी राहण्याची, त्यांना मदत करून उभे करण्याची आहे. आपण सगळे मिळून काही करत आहोत. ही वेळ नक्कीच निघुन जाईल. सध्या अगदी सुरुवातीच्या काळात आरोग्य तपासणी, घरगुती सामान, स्थलांतर या गोष्टी आम्ही करत आहोत, असं त्यांनी सांगितलं आहे. दुसरीकडे आज रोहित पवार देखील चिपळूणच्या दौऱ्यावर होते.
तर ठरलं! नाशिक मनपा निवडणूक अमित ठाकरेंच्या नेतृत्वात, मनसेची पहिली मोठी घोषणा
दरम्यान, राज्याच्या १३ जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पूराने, जनजीवन विस्कळीत झालं असून, मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झालेली आहे. या पार्श्वभूमीवर, पूरग्रस्तांना तातडीची १० हजार रुपयांची मदत जाहीर केली असून, उद्यापासून ही रक्कम खात्यावर जमा होईल, अशी घोषणा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.
“पंकजाताई आता बस्स! जिथे योग्य सन्मान केला जाईल, त्या शिवसेनेत प्रवेश करा”, सोशल मीडियावर मोहीम सुरु
राज्यात आत्तापर्यंत अतिवृष्टीने आतापर्यंत २१३ लोकांचा मृत्यू झाला असून, ८ जण बेपत्ता आहेत. तर ५२ लोक जखमी झाले असून, ४०० जनावरे आणि ६० हजार कोंबडय़ा दगावल्या आहेत. अतिवृष्टीमुळे १४०० गावांना फटका बसला असून, पूरग्रस्त भागातील ४ लाख ३५ हजार लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. कोकणातील एकूण १०४९ गावातील ८ हजार २३७ हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून, १२०० घरांना फटका बसला आहे.
Read Also :
- “कुठली भाषा वापरावी याबद्दल तर अजितदादांनी बोलूच नये”, नितेश राणेंची खोचक टीका
- आजोबांचा सल्ल्याकडे केला नातवानेच कानाडोळा, मग सल्ले फक्त फडणवीस आणि राज्यपालांसाठी?
- “आंतरविरोधाला सुरूवात झाली आहे, जेव्हा सरकार पडेल तेव्हा पर्याय देवू”; फडणवीसांचा पुनरुच्चार
- अधिकाऱ्यांना पाहण्यासाठी हे लोक दौरा करतात का? अजित पवारांचा नारायण राणेंवर निशाणा
- पक्ष बिक्ष काही नाही, सध्याचं संकट आणि त्यासाठीचं समर्पण महत्त्वाचं – पंकजा मुंडे