मुंबई : टास्क फोर्सच्या मिटींगनंतर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी संचारबंदी बाबत मोठी घोषणा केली आहे. राज्यातील २५ जिल्ह्यातील निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली आहे. तसेच ११ जिल्ह्यांमध्ये लेव्हल तीनचे नियम कायम राहणार असून या ठिकाणी निर्बंध कायम राहणार आहेत, अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली.
फडणवीस-पंकजा मुंडे यांच्या राजकीय संबंधांवर, रामदास आठवलेंचा धक्कादायक खुलासा!
राजेश टोपे यांनी मीडियाशी बोलताना ही घोषणा केली. टास्क फोर्सच्या मिटींगमध्ये २५ जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे. तिथं सर्व निर्बंधांचे शिथिलीकरण करण्याचा निर्णय झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे याची फाईल जाईल. त्यावर ते सही करतील. त्यानंतर एक दोन दिवसात ही शिथिलता देण्यात येणार आहे, असं टोपे यांनी सांगितलं.
“पंकजा मुंडे समजूतदार, त्या कधीच बंडाचा विचार करणार नाहीत”- चंद्रकांत पाटील
राज्यातील अकरा जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. ही परिस्थिती अजून निवळलेली नाही. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, कोकणात रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, मराठवाड्यात बीड आणि उत्तर महाराष्ट्रातील नगरमध्ये निर्बंध कायम राहतील. हे अकरा जिल्हे लेव्हल तीनमध्येच राहणार आहेत, असं त्यांनी सांगितलं.
पंकजा मुंडे नाराज नाहीत, राजीनामे न देण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन – चंद्रशेखर बावनकुळे
सिनेमा गृह आणि मॉल मधील कर्मचारी यांच लसीकरण पूर्णपणे करून चालू ठेवण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. रेल्वे विभागाशी चर्चा करून लोकल सुरू करण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील असं टोपे यांनी सांगितलं. लोकल प्रवासाबाबत पुढील एक ते दोन दिवसांत निर्णय येण्याची शक्यता आहे, असंही ते म्हणाले.
या जिल्ह्यात होणार निर्बंध शिथिल
मराठवाडा: परभणी, लातूर, जालना, नांदेड, हिंगोली, औरंगाबाद, उस्मानाबाद
विदर्भ: अमरावती, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, बुलढाणा, भंडारा. यवतमाळ, वर्धा, वाशीम, हिंगोली
कोकण: रायगड, ठाणे, मुबई
उत्तर महाराष्ट्र: जळगांव, धुळे, नंदुरबार, नाशिक
Read Also :
- “पंकजाताई आता बस्स! जिथे योग्य सन्मान केला जाईल, त्या शिवसेनेत प्रवेश करा”, सोशल मीडियावर मोहीम सुरु
- “कुठली भाषा वापरावी याबद्दल तर अजितदादांनी बोलूच नये”, नितेश राणेंची खोचक टीका
- पुण्यातील रिंगरोडमुळे २५ टक्के प्रदूषणात घट; बाहेरून येणारी ६० ते ७० हजार वाहने कमी होणार
- आजोबांचा सल्ल्याकडे केला नातवानेच कानाडोळा, मग सल्ले फक्त फडणवीस आणि राज्यपालांसाठी?
- “आंतरविरोधाला सुरूवात झाली आहे, जेव्हा सरकार पडेल तेव्हा पर्याय देवू”; फडणवीसांचा पुनरुच्चार