कराड : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सातत्याने राज्यातील पूरग्रस्त भागांना भेटी देत आहेत. आज कराडमध्ये पाहणी केल्यानंतर ते सांगलीला रवाना झाले. यावेळी त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, “सत्तेत येण्यासाठी आमच्याकडून कुठलेही प्रयत्न केले जात नसून, या सरकारमधील आंतर्विरोध आता बाहेर येऊ लागला आहे, त्यामुळे हे सरकार त्यानेच पडेल आणि जेव्हा पडेल, तेव्हा आम्ही सक्षम पर्याय देवू,” असा पुनरुच्चार केला आहे.
तळीये गावाचा दौरा केल्यावर फडणवीस यांनी, चिपळूण शहराचा आणि सातारा जिल्ह्याचा दौरा केला, त्यानंतर आता ते सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यादरम्यान त्यांनी, “पूरग्रस्तांवरील संकट मोठं असून, सरकारने त्यांना तातडीने मदत द्यावी सरकार पॅकेज जाहीर करणार आहे, असं ऐकलं आहे, ते द्याच! पण आता लोकांना तातडीची हवी आहे, ती सरकारने त्वरित द्यावी. तसेच, मुख्यमंत्र्यांनी सर्वांना सोबत घेऊन बसावं आणि मदतीबाबत निर्णय घ्यावा,” असा सल्ला मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
अधिकाऱ्यांना पाहण्यासाठी हे लोक दौरा करतात का? अजित पवारांचा नारायण राणेंवर निशाणा
तसेच, “आपत्ती व्यवस्थापनाची अंमलबजावणी करणारे नवीन मंत्रालय स्थापण्याची गरज आहे. आम्ही २०१९ मध्ये सांगली-कोल्हापूरच्या महापुरावेळी नियमांच्या पलिकडे जाऊन मदत केली होती, तशी NDRF च्या निकषाच्या पलिकडे जाऊन या सरकारने पूरग्रस्तांना मदत करावी. ज्यावेळी एक्स्ट्राऑर्डिनरी परिस्थिती असते, तेव्हा निर्णयही एक्स्ट्राऑर्डिनरी घ्यायचे असतात,” असा टोला देखील त्यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.
पक्ष बिक्ष काही नाही, सध्याचं संकट आणि त्यासाठीचं समर्पण महत्त्वाचं – पंकजा मुंडे
यावेळी त्यांनी, “मंत्री घोषणा करतात, मात्र कॅबिनेटला जात नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीत समन्वयाला वेळ लागत आहे. अनेक ठिकाणी तातडीची मदत मिळालेली नाही. तुम्ही बुडव्यांना मदत करू नका अशी आमची भूमिका आहे. सरकारने बारमालकांना नक्कीच मदत करावी, मात्र त्याआधी त्यांनी पूरग्रस्तांना तातडीची मदत करण्याला प्राधान्य द्यावं,” असा निशाणा त्यांनी साधला आहे. त्यामुळे, राज्य सरकारने सर्वात आधी पुनर्वसन आणि तातडीची मदत देण्याला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा राज्यभरातून व्यक्त केली जात आहे.
Read Also :
- राज्यात होत असलेल्या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत; भाजप आमदाराचा दावा
- “आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही आघाडीला पाठिंबा का द्यावा?”
- चंद्रकांत पाटलांना भाषणाच्या क्लिप पाठवल्या नाही, राज ठाकरे म्हणतात….
- किरीट सोमय्यांविरोधात शिवसेना आमदाराचा १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
- राज्य सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे राज्यात पूर परिस्थिती – राज ठाकरे