औरंगाबाद/गंगापूर : दोन वर्षापेक्षा जास्त काळ देशासह जगात कोरोना रोगाने थैमान घातले आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी वारंवार प्रशासनाकडून ताळेबंदी केली जाते. त्यामुळे साहजिकच शेतकरी, कामगार व व्यापारी यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते. या अङचणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडण्यासाठी भाजपचे गंगापूर विधानसभा मतदारसंघात तीन वेळा निवडून आलेले आमदार प्रशांत बंब गेली दीड वर्षापासुन मुख्यमंञ्यांच्या भेटीच्या प्रतिक्षेत आहेत.
…अन् देवेंद्र फडणवीस दरडग्रस्तांच्या मांडीला मांडी लावून बसले जेवायला!
वारंवार भेटीसाठी पञव्यवहार करुनही त्यांना कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचे त्यांनी एका व्हिडियोद्वारे जाहीर केलं आहे. हा व्हिडियो सोशल मिडियावर खूपच व्हायरल होत आहे. राज्यात होत असलेल्या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत, असे सांगत आमदार प्रशांत बंब यांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे.
अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या, १२ ठिकाणांवर सीबीआयने जलदगतीने टाकले छापे
कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये योग्य नियोजन नसणे, आरोग्य विभागात डॉक्टर व कर्मचारी यांची अपुरी संख्या आणि रखडलेली भरती प्रक्रिया, शाळा व कॉलेज यांच्या फी व ऑफलाईन चालु करणे, पिकविमाप्रश्नी त्यांना मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी बोलायचं आहे. मराठवाड्यातील शासकीय योजना व अपुरी कामे असताना त्यामध्ये झालेला शेकडो कोटींचा भ्रष्टाचार त्यांनी पुराव्यासहित संबंधित मंञ्याना सादर केल्याचं त्यांनी सांगितलं.
नागपुरात ‘बॅनर वॉर’, युवक काँग्रेस कार्यकर्त्यांचं महापालिका मुख्यालयात आंदोलन
मुंबईनंतर शिवसेनेचं पहिले प्रेम मराठवाडा आहे , हजारो शेतकरी आत्महत्या होतात आणि भविष्यातील आत्महत्या रोखण्यासाठी वेळीच पाऊले ऊचलावी लागतील , गतवेळी झालेल्या अधिवेशनात सर्वपक्षीय आमदारांना प्रश्न मांडण्यासाठी पुरेसा वेळ दिला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. राज्यात होत असलेल्या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. आरोप खोटे ठरले तर राजीनामा देईन म्हणत आमदार बंब यांनी मोठा गौप्यस्फोट केला. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमदार प्रशांत बंब यांनी भेटीसाठी वेळ देणार का?, हे याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Read Also :
- “आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही आघाडीला पाठिंबा का द्यावा?”
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात, देश सुरक्षित नाही; संजय राऊत यांची टीका
- महापालिका रणधुमाळी : भाजपने काय केले याची पोलखोल करा, राज ठाकरेंचे आदेश
- राज्यातील लॉकडाऊन उठवण्याबाबत,आज मंत्री मंडळात निर्णय होण्याची शक्यता
- राज्य सरकारच्या परवानगीनेच फोन टॅपिंग, आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांचा कोर्टात दावा