मुंबई : किरीट सोमैय्या यांचा शौचालय घोटाळा शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी बाहेर काढल्यानंतर, सोमैय्या यांनी सरनाईक यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. तसेच, सरनाईक यांच्या विरोधात बदनामी करणारे बॅनरही त्यांनी ठाण्यात लावले होते. यांनतर, खोट्या विधानांबाबत माफी न मागितल्यास सरनाईक यांनी, सोमैय्यांविरोधात मानहानीचा दावा दाखल केला जाईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार आता ३ लाखांची स्टॅम्प ड्युटी भरून, ठाणे कोर्टात १०० कोटींचा विशेष दिवाणी दावा दाखल केला आहे.
700 कोटी हे राज्यसरकारचे, केंद्राचा यात काडी मात्र पण संबंध नाही – अजित पवार
मीरा भाईंदर मनपा हद्दीत पर्यावरणाचा ऱ्हास करून, युवक प्रतिष्ठानच्या संचालिका श्रीमती मेधा किरीट सोमय्या यांनी, त्यांचे पती किरीट सोमैय्यांच्या राजकीय शक्तीचा वापर करून, तब्बल १६ ठिकाणी सीआरझेड व कांदळवन क्षेत्रात सार्वजनिक शौचालयांचे अनधिकृत बांधकाम केले आहे. तसेच, पालिका अधिकाऱ्यांची फसवणूक करून, खोटी कागदपत्रे सादर करून, या बांधकामांची बिलेही वसूल केली आहेत. याप्रकरणी या दोघांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी, सरनाईक यांनी फेब्रुवारी महिन्यात केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात, देश सुरक्षित नाही; संजय राऊत यांची टीका
तसेच, त्यांनी मुख्यमंत्री, नगरविकासमंत्री, गृहमंत्री यांच्याकडे मागणी करून, या प्रकरणाचा अहवालही सरकारने मागवावा अशी विनंती केली होती. त्यानुसार अहवाल मागवल्यानंतर त्यात, पर्यावरणाचा ऱ्हास करून या सर्व शौचालयांचे बांधकाम केल्याचे स्पष्ट झाले. यांनतर गृहमंत्र्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण सोपवले होते आणि पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे एकीकडॆ राज्य सरकारकडून तर, आता कोर्टाकडून सोमैय्या यांना दणका मिळण्याची शक्यता आहे.
महापालिका रणधुमाळी : भाजपने काय केले याची पोलखोल करा, राज ठाकरेंचे आदेश
याबाबत सरनाईक यांनी, “केंद्र आणि राज्य या संघर्षात, सत्ताधारी पक्षातला म्हणून माझ्यावर केवळ राजकीय हेतूने आणि बदनाम करण्यासाठी सोमय्या आरोप करत होते. माझ्याविरोधात त्यांनी ठाण्यात येऊन पत्रकार परिषद घेऊन त्यात खोटी वक्तव्ये केली, खोटी विधाने केली आणि त्याआधारे खोट्या बातम्या समाज माध्यमात पसरवल्या. माझ्याबद्दल जनतेत संभ्रम निर्माण करण्यासाचा आणि माझी प्रतिमा खराब करण्याचा त्यांनी ठरवून प्रयत्न केला असून, या विरोधात आता मी कोर्टात दावा दाखल केला आहे,” असे सांगितले.
राज्यातील लॉकडाऊन उठवण्याबाबत,आज मंत्री मंडळात निर्णय होण्याची शक्यता
दरम्यान इतर वेळी महाविकास आघाडीतील नेत्यांचा आणि मंत्र्यांचा घोटाळा पुराव्यानिशी बाहेर काढणारे भाजपचे ‘शेरलॉक होम्स, आता स्वतःच घोटाळ्यात सापडले असून, आता त्यांना कोर्टाच्या प्रश्नांची उत्तरे देणे भाग आहे. त्यामुळे सोमैय्या यांच्या अडचणीत एकंदरीत वाढ होताना दिसून येत आहे.
Read Also :
- राज्य सरकारच्या परवानगीनेच फोन टॅपिंग, आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांचा कोर्टात दावा
- कार्यकर्त्यांची भावनिक हाक, पंकजा मुंडेंनी शिवसेनेत जावे, पक्षात मुंडेना खडसेंसारखी वागणूक
- ‘पेगॅसस’ प्रकरणाचा खरा सूत्रधार कोण, देशाला जाणून घेण्याचा अधिकार आहे, सामनातून केंद्र सरकारला सवाल
- भाजपसोबत युती नाहीच, नाशिकमध्ये मनसेचा स्वबळाचा नारा
- प्रताप सरनाईक यांच्याविरोधात कारवाई होणार? उच्च न्यायालयाने दिले ईडीला आदेश