पुणे : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पूरामुळे अनेकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ७०० कोटी रुपयांचे आर्थिक मदत जाहिर केली आहे. परंतू, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याचा खुलासा केला आहे. केंद्राने जाहिर केलेले ७००० कोटी रुपये हे राज्य सरकारचे आहेत. यात केंद्र सरकारचा काडी मात्र संबंध नाही, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी आज दिले. पुरग्रस्तांचे पंचनामे करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पंचनामे होताच मदत दिली जाईल, असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
मोठी बातमी : महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारकडून ७०० कोटींची मदत जाहीर
कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना मंगळवारी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे. केंद्राने पूरग्रस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जवळपास ७०० कोटी मंजूर केले असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी दिली. राज्यात काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांनी पातळी ओलांडल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. याचा फटका हा राज्यातील शेतीलाही बसला आहे. पुराचे शेतात घुसल्याने प्रवाहाच्या वेगात ही पिकेही वाहून गेली आहेत तर काही ठिकाणी पाणी साचून राहिल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पेगासस प्रकरणावरून भाजप विरोधात दिल्लीत एकवटले, महाविकास आघाडीसह सगळे विरोधक
दरम्यान, आज माध्यमाशी बोलताना अजित पवार यांनी याबद्दल खुलासा केला आहे. ते म्हणाले, केंद्राने जाहिर केलेले ७०० कोटी रुपये हे राज्य सरकारचे आहेत. त्यामध्ये केंद्र सरकारचा काडी मात्र संबंध नाही. कोकणातील पुरग्रस्तांचे पंचनामे करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पंचनामे दोन दिवसात पुर्ण होतील. ते झाले की तात्काळ मदत पुरवीली जाईल. पुरग्रस्तांच्या खात्यावर नुकसानीची रक्कम पोचवली जाईल, त्यामुळे काळजी करण्याची काही एक अवश्यकता नाही, असेही अजित पवार यांनी सांगितले.
Read Also :
- महापालिका रणधुमाळी : भाजपने काय केले याची पोलखोल करा, राज ठाकरेंचे आदेश
- राज्य सरकारच्या परवानगीनेच फोन टॅपिंग, आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांचा कोर्टात दावा
- कार्यकर्त्यांची भावनिक हाक, पंकजा मुंडेंनी शिवसेनेत जावे, पक्षात मुंडेना खडसेंसारखी वागणूक
- ‘पेगॅसस’ प्रकरणाचा खरा सूत्रधार कोण, देशाला जाणून घेण्याचा अधिकार आहे, सामनातून केंद्र सरकारला सवाल
- भाजपसोबत युती नाहीच, नाशिकमध्ये मनसेचा स्वबळाचा नारा