मुंबई : राज्यात उद्भवलेल्या अभूतपूर्व पूरपरिस्थितीचा आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीचा, राज्यातील सत्ताधारी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांनी आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी, तसेच काही दिवसांपूर्वी राज्यातून केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलेले नारायण राणे यांच्यासोबत दोन्ही सभागृहाच्या विरोधी पक्ष नेत्यांनीही आढावा घेतला.
“आंतरविरोधाला सुरूवात झाली आहे, जेव्हा सरकार पडेल तेव्हा पर्याय देवू”; फडणवीसांचा पुनरुच्चार
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी, “मी आता दौऱ्यावर जात नाही. कारण आपल्यासाठी सर्व यंत्रणा फिरवावी लागते, जे की अशावेळी योग्य नाही. त्यामुळे कामात अडथळा येतो, शासकीय यंत्रणेचं काम वाढतं आणि ते होऊ नये, म्हणून ज्यांचा या भागाशी संबंध नाही, त्यांनी दौरे टाळावेत,” असं आवाहन केलं.
दरम्यान, त्यांच्या या सल्ल्याला घरातूनच केराची टोपली दाखवली गेली असून, आमदार रोहित पवार चिपळूणच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यांच्यावर आता टीका होत असून, “आजोबांच्या आवाहनानंतरी घरातीलच व्यक्ती चिपळूणच्या दौऱ्यावर जात आहे. त्यांना आजोबांचा सल्ला मान्य नाही का? की हे सल्ले फक्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासाठीच होते? असा खोचक सवाल आमदार सदाभाऊ खोत यांनी विचारला आहे.
कोकणात अतिवृष्टीमुळं आणि दरडी कोसळून झालेलं नुकसान प्रचंड मोठं आहे… या संकटात उध्वस्त झालेले संसार नव्याने उभे करावे लागणार आहे. त्यासाठी आपल्या सर्वांच्या मदतीची गरज आहे…https://t.co/t4jlqXp8Id#Maharashtraflood pic.twitter.com/nkqe8xrGRX
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 28, 2021
अधिकाऱ्यांना पाहण्यासाठी हे लोक दौरा करतात का? अजित पवारांचा नारायण राणेंवर निशाणा
राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये आलेल्या अतिवृष्टीने हाहा:कार उडाला असून, यामुळे आत्तापर्यंत १६४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १०० जण अजूनही बेपत्ता आहेत. ९०,००० जणांचे स्थलांतर केले गेले असून, निसर्गाच्या या प्रकोपात तब्बल २५ हजार ५६४ जनावरं दगावली आहेत. मात्र, पूरामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रायगड या ५ जिल्ह्यांतील शेतकरी, कष्टकरी, उद्योजकांचं सर्वाधिक नुकसान झालं आहे.
आजोबांनी सांगितले…
राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे करून नयेत.
आजोबांच्या सल्ल्याला नातवाच मान नाही आणि जामखेड चे आमदार चीपळूनच्या दौऱ्यावर. की आजोबांचा हा सल्ला फक्त राज्यपाल व फडणवीसांकरिता होता? https://t.co/fbWA5domJG— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) July 29, 2021
पक्ष बिक्ष काही नाही, सध्याचं संकट आणि त्यासाठीचं समर्पण महत्त्वाचं – पंकजा मुंडे
या पार्श्वभूमीवर केंद्राकडून ७०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली असून, राज्य सरकारकडून आद्यप कोणतीही मदत जाहीर केली गेलेली नाही. तसेच, तातडीने मदत म्हणून जाहीर केलेली १० हजार रुपयांची मदत देखील पूर्णपाने सगळ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे, जनतेमध्ये रोष असून, आमचे पुनर्वसन करण्यात यावे आणि आमचे कर्ज माफ करावे, अशी मागणी त्यांनी सरकराकडे केली आहे.
Read Also :
- राज्यात होत असलेल्या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत; भाजप आमदाराचा दावा
- “आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही आघाडीला पाठिंबा का द्यावा?”
- चंद्रकांत पाटलांना भाषणाच्या क्लिप पाठवल्या नाही, राज ठाकरे म्हणतात….
- किरीट सोमय्यांविरोधात शिवसेना आमदाराचा १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
- राज्य सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे राज्यात पूर परिस्थिती – राज ठाकरे