मुंबई : नुकत्याच मोदी सरकारच्या झालेल्या केंद्रीय मंत्री मंडळाच्या विस्तारात ओबीसी नेत्यांचा भरणा आहे. यात राज्यातून नारायण राणे आणि इतर काही महत्वाच्या नेत्यांसोबतच खासदार प्रीतम मुंडे यांचे नाव देखील चर्चेत होते. मात्र, त्यांचा या विस्तारात समावेश करण्यात आला नाही आणि त्यामुळे, मुंडे भगिनींना जाणूनबुजून भाजपकडून डावलण्यात येत आहे, अशी समर्थकांमध्ये नाराजी पसरली आणि त्यांनी एकामागोमाग एक आपले राजीनामे देण्यास सुरुवात केली.
फडणवीस-पंकजा मुंडे यांच्या राजकीय संबंधांवर, रामदास आठवलेंचा धक्कादायक खुलासा!
दरम्यान, या ‘नाराजी’ आणि ‘राजीनामा’ नाट्यांनंतर पंकजा मुंडे यांनी स्वतःच, या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या सगळ्या चुकीच्या चर्चांना पूर्णविराम देत, पक्ष सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे देखील नामंजूर केले. मात्र, यामुळे पुन्हा एकदा भाजप आणि त्यात ओबीसी नेत्यांना कसे डावलले जाते, या चर्चांना उधाण आले.
“पंकजा मुंडे समजूतदार, त्या कधीच बंडाचा विचार करणार नाहीत”- चंद्रकांत पाटील
मात्र, अजूनही कार्यकर्त्यांच्या आणि वंजारी समाजच्या मनातली आग शमल्याचे दिसत नसून, पंकजाताईंनी भाजप सोडून द्यावा आणि तातडीने शिवसेनेत प्रवेश करावा, असं आवाहन वंजारी समाजाकडून करण्यात येत आहे. त्यांनी भाजप सोडून शिवसेनेत प्रवेश केल्यास, तिथे त्यांचा योग्य तो सन्मान केला जाईल, अशी भावना आता या समाजात निर्माण होऊ लागली आहे. तसेच, “पंकजाताई भाजपक्ष सोडा, शिवसेनेत प्रवेश करा,” अशी मोहीम देखील वंजारी सेवा संघातर्फे सोशल मीडियावर चालविण्यात येत आहे.
पंकजा मुंडे नाराज नाहीत, राजीनामे न देण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन – चंद्रशेखर बावनकुळे
गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या भगिनींना भाजप सातत्याने डावलत आहे, असा आरोप भाजपवर इतर पक्षांकडून केला जात आहे. “भाजपत ओबीसींना डावललं जातं, फडणवीसांनी मला त्रास दिला,” असा थेट आरोप ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश करताना केला होता. यातच आता रामदास आठवलेंच्या या वक्तव्याने भाजपत खरंच ओबीसी नेत्यांना डावलले जाते, की फडणवीसांच्या नेतृत्वात असल्यामुळे भाजपत हे घडत आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.
Read Also :
- “कुठली भाषा वापरावी याबद्दल तर अजितदादांनी बोलूच नये”, नितेश राणेंची खोचक टीका
- पुण्यातील रिंगरोडमुळे २५ टक्के प्रदूषणात घट; बाहेरून येणारी ६० ते ७० हजार वाहने कमी होणार
- आजोबांचा सल्ल्याकडे केला नातवानेच कानाडोळा, मग सल्ले फक्त फडणवीस आणि राज्यपालांसाठी?
- “आंतरविरोधाला सुरूवात झाली आहे, जेव्हा सरकार पडेल तेव्हा पर्याय देवू”; फडणवीसांचा पुनरुच्चार
- अधिकाऱ्यांना पाहण्यासाठी हे लोक दौरा करतात का? अजित पवारांचा नारायण राणेंवर निशाणा