मुंबई : राज्याच्या १३ जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पूराने, जनजीवन विस्कळीत झालं असून, मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झालेली आहे. त्यामुळे, राज्य सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी विरोधी पक्षाकडून करण्यात येत होती. तसेच, नागरिकांकडूनही सरकारला हेच सांगण्यात येत होते. या पार्श्वभूमीवर, पूरग्रस्तांना तातडीची १० हजार रुपयांची मदत जाहीर केली असून, उद्यापासून ही रक्कम खात्यावर जमा होईल, अशी घोषणा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.
मोठी बातमी : २५ जिल्ह्यात निर्बंध शिथिल होणार, ११ जिल्ह्यांमध्ये मात्र लेव्हल तीनचे नियम कायम
आज माध्यमाशी बोलताना याबाबत ते म्हणाले, “पूरग्रस्तांना तातडीने मदत देण्याच्यासाठी १० हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत. तसेच, प्रशासनाला तातडीने पंचनामे करून अहवाल देण्यास सांगितलं आहे. या पावसामुळे ४ लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. निसर्गाचा समतोल बिघडल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता इथून पुढे या घटना टाळण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याबरोबरच, तज्ज्ञांचा सल्लाही घेतला जाणार आहे,” अशी देखील माहिती त्यांनी दिली.
तर ठरलं! नाशिक मनपा निवडणूक अमित ठाकरेंच्या नेतृत्वात, मनसेची पहिली मोठी घोषणा
यावेळी, “केंद्राने जी मदत केली, ती गेल्यावर्षीच्या आलेल्या पुराची आहे. लोकांमध्ये गैरसमज झाला की पूर आला आणि पैसे दिले. केंद्राने मदत केली, त्यांचे आभार मानलेच पाहिजे. राज्यात तौक्ते, निसर्ग वादळ आलं, विदर्भात महापूर झाला त्याचीही अजून मदत केंद्राकडून आलेली नाही. राज्याला आत्तापर्यंत ११४१ कोटी या सगळ्याचे केंद्राकडून मिळाले आहेत, त्यामुळे आत्ता जसे दिले, तसे पुढचेही पैसे मिळावेत हीच केंद्राकडून अपेक्षा आहे,” असं त्यांनी सांगितलं.
“पंकजाताई आता बस्स! जिथे योग्य सन्मान केला जाईल, त्या शिवसेनेत प्रवेश करा”, सोशल मीडियावर मोहीम सुरु
राज्यात आत्तापर्यंत अतिवृष्टीने आतापर्यंत २१३ लोकांचा मृत्यू झाला असून, ८ जण बेपत्ता आहेत. तर ५२ लोक जखमी झाले असून, ४०० जनावरे आणि ६० हजार कोंबडय़ा दगावल्या आहेत. अतिवृष्टीमुळे १४०० गावांना फटका बसला असून, पूरग्रस्त भागातील ४ लाख ३५ हजार लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. कोकणातील एकूण १०४९ गावातील ८ हजार २३७ हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून, १२०० घरांना फटका बसला आहे.
Read Also :
- “कुठली भाषा वापरावी याबद्दल तर अजितदादांनी बोलूच नये”, नितेश राणेंची खोचक टीका
- पुण्यातील रिंगरोडमुळे २५ टक्के प्रदूषणात घट; बाहेरून येणारी ६० ते ७० हजार वाहने कमी होणार
- आजोबांचा सल्ल्याकडे केला नातवानेच कानाडोळा, मग सल्ले फक्त फडणवीस आणि राज्यपालांसाठी?
- “आंतरविरोधाला सुरूवात झाली आहे, जेव्हा सरकार पडेल तेव्हा पर्याय देवू”; फडणवीसांचा पुनरुच्चार
- आस्मानी संकटात कोकणच्या मदतीला पश्चिम महाराष्ट्राचा सुपुत्र धावला! महेश लांडगे यांचा राज्यातील २८८ आमदारांसमोर आदर्श