नाशिक : सध्या मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे हे, अमित ठाकरेंसह नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी, नाशिकमध्ये मनसेने उभारलेल्या बोटॅनिकल गार्डनला भेट दिली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशाचं नेतृत्व करावं असं, शिवसेना खासदार संजय राऊत म्हणतात. पण ते काहीही बोलतात. मुख्यमंत्री जिथे कोयनेला पोहोचू शकत नाहीत, तिथे ते दिल्लीला काय पोचणार?,” अशी बोचरी टीका त्यांनी मुख्यमंत्र्यावर केली आहे.
“केंद्राने जाहीर केलेल्या निधीचा आणि सध्याच्या पुराचा काहीही संबंध नाही” अजित पवारांचा पंचनामा
मनसेने नाशिक महापालिकेवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत असून, नाशिक महापालिका स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर, आता नाशिक महापालिका निवडणूक अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढवणार असल्याची मोठी घोषणा, मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी आज केली. आज अमित ठाकरे आणि संदीप देशपांडे यांनी नाशिक पालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी अमित ठाकरे यांनी, मनसेच्या काळात नाशकात तयार झालेल्या प्रकल्पांची पाहणी केली.
“पर्यावरणमंत्री म्हणून तुम्ही काय केलंत?” संतप्त चिपळूणकरांचा विचारला आदित्य ठाकरेंना जाब
मनसे अध्यक्ष राज ठाकरे, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सक्रिय झाले असून, त्यांनी प्रामुख्याने पुणे आणि नाशिक महापालिकेवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे. नाशिकमध्ये मनसेची सत्ता होती, मात्र त्यांना ती राखता आली नाही, यावेळेस मात्र नाशिक महापालिका हातून निसटून दयायची नाही, या उद्देशानेच ते अजेंडा ठरवत आहेत.
अखेर पूरग्रस्तांच्या खात्यात यादिवशी जमा होणार १० हजारांची मदत, वडेट्टीवारांनी केली मोठी घोषणा
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ३ दिवसांपूर्वी पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी साताराला जात होते. मात्र, खराब हवामानामुळे त्यांचं हेलिकॉप्टर कोयनानगर परिसरात लँड होऊ शकलं नाही आणि त्यांना पुन्हा पुण्याला जावं लागलं. तिथून त्यांनी मुंबई गाठली. त्यावरुन संदीप देशपांडेंनी मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला.
Read Also :
- मोठी बातमी : २५ जिल्ह्यात निर्बंध शिथिल होणार, ११ जिल्ह्यांमध्ये मात्र लेव्हल तीनचे नियम कायम
- तर ठरलं! नाशिक मनपा निवडणूक अमित ठाकरेंच्या नेतृत्वात, मनसेची पहिली मोठी घोषणा
- “पंकजाताई आता बस्स! जिथे योग्य सन्मान केला जाईल, त्या शिवसेनेत प्रवेश करा”, सोशल मीडियावर मोहीम सुरु
- “कुठली भाषा वापरावी याबद्दल तर अजितदादांनी बोलूच नये”, नितेश राणेंची खोचक टीका
- आजोबांचा सल्ल्याकडे केला नातवानेच कानाडोळा, मग सल्ले फक्त फडणवीस आणि राज्यपालांसाठी?