मुंबई : राज्यात आलेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्राने ७०० कोटी रुपयतांचा निधी जाहीर केला. दरम्यान, हा निधी ऑक्टोबर २०२० मध्ये राज्यावर आलेल्या नैसर्गिक संकटच्यावेळी केंद्रीय पथक पाहणी करण्यासाठे आले होते. तेव्हा त्यांच्याकडे ३ हजार ७०० कोटींची मागणी करण्यात आली होती, त्यातले असल्याची पुष्टी आधीच कृषिमंत्री दादा भुसेंनी केली होती. यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील केंद्राने जाहीर केलेल्या निधीचा आणि सध्याच्या पुराचा काहीही संबंध नाही,” असं सांगितलं.
“पर्यावरणमंत्री म्हणून तुम्ही काय केलंत?” संतप्त चिपळूणकरांचा विचारला आदित्य ठाकरेंना जाब
यावेळी, “राज्य सरकारकडून आम्ही मुख्यमंत्र्यांचे पत्र केंद्राला पाठवणार आहोत. तसेच, रस्ते, शेती, घरे, दुकाने यांच्या झालेल्या नुकसानीचा अंदाज घेऊन, नुकसानीचा संपूर्ण अहवाल देखील तयार करून पाठवणार आहोत. केंद्राने राज्यात झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी तातडीने टीम पाठवावी, अशी मागणी केली आहे. गुजरातला १००० कोटींचे पॅकेज जाहीर केले, तसं ते राज्यालाही देऊ शकतात, पण तो त्यांचा अधिकार आहे,” अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकारला टोला लगावला.
अखेर पूरग्रस्तांच्या खात्यात यादिवशी जमा होणार १० हजारांची मदत, वडेट्टीवारांनी केली मोठी घोषणा
तसेच, “निसर्गात होणाऱ्या बदलाचे काहीच सांगता येत नाही. ग्लोबल वोर्मिंगमुळे राज्यातच घडतंय असं नाही. हे उत्तराखंड आणि परदेशातल्या चीन, जर्मनी यांसारख्या देशातही घडतंय. त्यामुळे, भूगर्भात काही बदल होतायत का? तसं काही नसेल तर मग हे का घडलं? या सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारकडून तज्ज्ञांची समिती नेमण्यात येणार आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.
मोठी बातमी : २५ जिल्ह्यात निर्बंध शिथिल होणार, ११ जिल्ह्यांमध्ये मात्र लेव्हल तीनचे नियम कायम
दरम्यान, राज्यात आत्तापर्यंत अतिवृष्टीने आतापर्यंत २१३ लोकांचा मृत्यू झाला असून, ८ जण बेपत्ता आहेत. तर ५२ लोक जखमी झाले असून, ४०० जनावरे आणि ६० हजार कोंबडय़ा दगावल्या आहेत. अतिवृष्टीमुळे १४०० गावांना फटका बसला असून, पूरग्रस्त भागातील ४ लाख ३५ हजार लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. कोकणातील एकूण १०४९ गावातील ८ हजार २३७ हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून, १२०० घरांना फटका बसला आहे.
Read Also :
- तर ठरलं! नाशिक मनपा निवडणूक अमित ठाकरेंच्या नेतृत्वात, मनसेची पहिली मोठी घोषणा
- “पंकजाताई आता बस्स! जिथे योग्य सन्मान केला जाईल, त्या शिवसेनेत प्रवेश करा”, सोशल मीडियावर मोहीम सुरु
- “कुठली भाषा वापरावी याबद्दल तर अजितदादांनी बोलूच नये”, नितेश राणेंची खोचक टीका
- आजोबांचा सल्ल्याकडे केला नातवानेच कानाडोळा, मग सल्ले फक्त फडणवीस आणि राज्यपालांसाठी?
- “आंतरविरोधाला सुरूवात झाली आहे, जेव्हा सरकार पडेल तेव्हा पर्याय देवू”; फडणवीसांचा पुनरुच्चार