मुंबई: महाराष्ट्रातील महापुरामुळे तिसऱया सत्रातील जेईई-मेन परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा येत्या ३ आणि ४ ऑगस्ट रोजी घेतली जाणार असून त्या परीक्षेची प्रवेशपत्रे राष्ट्रीय चाचणी संस्थेने आज उपलब्ध करून दिली. रायगड, कोल्हापूर, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली आणि सातारामध्ये महापुरामुळे ही परीक्षा होऊ शकली नव्हती. त्यामुळे या भागांमध्ये ज्यांची परीक्षा केंद्रे होती त्या विद्यार्थ्यांचीच पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे.
हे पण वाचा: पुणे मेट्रोची वनाज ते आयडियल कॉलनी ‘ट्रायल रन’? अजित पवारांच्या हस्ते मिळणार हिरवा झेंडा
जेईई-मेन परीक्षेचे तिसरे सत्र २५ जुलै आणि २५ जुलै रोजी पार पडले. महाराष्ट्राच्या पूरग्रस्त भागांतील विद्यार्थ्यांना त्या परीक्षेला बसता आले नव्हते. त्यांची परीक्षा पुन्हा घेतली जाईल असे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जाहीर केले होते. बहरीन येथेही लॉकडाऊनमुळे अनेक विद्यार्थ्यांना तिसऱया सत्रातील जेईई परीक्षा देता आली नव्हती. त्यांचीही परीक्षा ३ ते ५ ऑगस्ट रोजी घेतली जाणार असल्याचे ‘एनटीए’ने जाहीर केले आहे.
हे पण वाचा: अखेर पूरग्रस्तांच्या खात्यात यादिवशी जमा होणार १० हजारांची मदत, वडेट्टीवारांनी केली मोठी घोषणा
राज्यात आलेल्या अतिवृष्टीमुळे मुंबईसह कोकण विभागाचे मोठे नुकसान झाले आहे. कोकणात रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना पावसाचा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पूर परिस्थितीमुळे ज्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना जेईई-मेन परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्वीट करुन याबद्दल दिली होती.
हे पण वाचा: ११ जिल्ह्यात लेवल ३ चे निर्बंध, २५ जिल्ह्यात निर्बंधांत शिथिलता, काय आहेत निर्बंध? वाचा थोडक्यात
पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षेची आणखी एक संधी देण्यात यावी, असे आदेश धर्मेंद्र प्रधान यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या संचालकांना दिले होते. जेईई मेन २०२१ सत्र ३ च्या परीक्षेला प्रविष्ट होण्याची संधी पुन्हा एकदा देण्यात यावी, असं प्रधान म्हणाले. कोल्हापूर, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील जे विद्यार्थी २५ ते २७ जुलै दरम्यान होणाऱ्या जेईई मेन जुलै सत्र ३ परीक्षेला पोहोचू शकणार नाहीत त्यांनी चिंता करु नये. अशा विद्यार्थ्यांना परीक्षेची पुन्हा एक संधी देण्यात आली आहे. परीक्षेच्या तारखा पुन्हा एकदा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यांचीही परीक्षा ३ ते ५ ऑगस्ट रोजी घेतली जाणार असल्याचे ‘एनटीए’ने जाहीर केले आहे.
Read Also :
- आजचे क्षण म्हणजे भारावून टाकणारे, आणि ऊर्जा देणारे; पंकजा मुंडे म्हणतात….
- राष्ट्रवादी रिलीफ फंडाच्यावतीने कोकणातील पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत
- पुणे मेट्रोची वनाज ते आयडियल कॉलनी ‘ट्रायल रन’? अजित पवारांच्या हस्ते मिळणार हिरवा झेंडा
- ११ जिल्ह्यात लेवल ३ चे निर्बंध, २५ जिल्ह्यात निर्बंधांत शिथिलता, काय आहेत निर्बंध? वाचा थोडक्यात
- तर ठरलं! नाशिक मनपा निवडणूक अमित ठाकरेंच्या नेतृत्वात, मनसेची पहिली मोठी घोषणा