कोल्हापूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री आज कोल्हापुरातील पूरस्थितीची पाहणी करत आहेत. ‘’मुख्यमंत्री बाळासाहेबांचे वंशज, आमचं म्हणणं जरुर ऐकतील’’, कोल्हापूरकरांची आर्त हाक यावेळी दिली आहे. तसेच यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने यांनी कोल्हापूर विमानतळावर मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं.
हे पण वाचा: पुणे मेट्रोची वनाज ते आयडियल कॉलनी ‘ट्रायल रन’? अजित पवारांच्या हस्ते मिळणार हिरवा झेंडा
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी या गावाची पाहणी केली. नृसिंहवाडी हे गाव आठवडाभरापासून पाण्यात आहे. पाऊस बंद झाला असला तरी पाणीपातळी अवघी दोन टक्के कमी झाली आहे. गावातील सर्व लोकांचे सुरक्षित स्थलांतर केले आहे. मात्र जनावरांचा चारा, लाईट पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. पाणी काही प्रमाणात ओसरलं असलं तरी कमरेएव्हढ्या पाण्यातून लोक घरापर्यंत पोहोचत आहेत.
हे पण वाचा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर; पूरग्रस्त भागाची करणार पाहणी!
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी करुन योग्य मदत द्यावी, जाहीर केलेली तुटपुंजी दहा हजारांची मदत ही स्वच्छता आणि जेवणखाण्याला पुरेल ही मदत वाढवावी अशी मागणी पूरग्रस्तांनी केली आहे. मुख्यमंत्री हे बाळासाहेब ठाकरेंचे वंशज आहेत, ढाण्या वाघ आहे तो महाराष्ट्राचा. आम्ही आवाज दिल्यावर ते थांबले, त्यांनी आमचं ऐकून घेतलं. मुख्यमंत्री आमच्या मागण्या पूर्ण करतील, असा विश्वास आहे, असं इथल्या नागरिकाने सांगितलं.
Read Also :
- राष्ट्रवादी रिलीफ फंडाच्यावतीने कोकणातील पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत
- आपलाच पेपर अन् आपलीच जाहिरात; ८८ पानी पेपर छापून सामनाने मुख्यमंत्र्याच्या आवाहनाला दाखवली केराची टोपली
- मोठी बातमी: राजकीय हालचालींना वेग, प्रशांत किशोर बनणार सोनिया गांधींचे सल्लागार?
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर; पूरग्रस्त भागाची करणार पाहणी!
- मनी लाँड्रिंग प्रकरणी: अनिल देशमुखांच्या संरक्षण मिळण्याच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी