मुंबई: पोलिस दलात क्रीम पोस्टिंग आणि बदल्यांतील भ्रष्टाचारावर निगराणी ठेवण्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीनेच फोन टॅपिंग करण्यात आले, अशी माहिती वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली. शुक्लांच्या वतीने ज्येष्ठ वकील महेश जेठमलानींनी बाजू मांडली. सीआयडीच्या प्रमुख असताना शुक्ला यांना तत्कालीन पोलिस महासंचालकांकडून काही फोन नंबर्सवर निगराणी ठेवण्याचे आदेश मिळाले होते.
हे पण वाचा: “पर्यावरणमंत्री म्हणून तुम्ही काय केलंत?” संतप्त चिपळूणकरांनी विचारला आदित्य ठाकरेंना जाब
यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत सवाल उपस्थित केले आहेत. रश्मी शुक्ला यांनी परवानगी घेऊन राजकीय नेत्यांचे फोन टॅप केले होते तर मग त्यांनी मुख्यमंत्र्यांची त्यासाठी परवानगी घेतली होती का? असा सवाल नवाब मलिक यांनी विचारला आहे.
हे पण वाचा: “केंद्राने जाहीर केलेल्या निधीचा आणि सध्याच्या पुराचा काहीही संबंध नाही” अजित पवारांचा पंचनामा
रश्मी शुक्लांच्या वकिलांनी कोर्टात शासकीय परवानगी घेऊन फोन टॅप केल्याचे सांगितले आहे. मात्र फोन टॅपसाठी दिशाभूल करून परवानगी घेण्यात आली आहे, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला. राजकीय नेत्यांचे फोन टॅप करण्यासाठी रश्मी शुक्ला यांनी राजद्रोह, देशद्रोह या नावाखाली परवानग्या घेतल्या होत्या, असेही नवाब मलिक म्हणाले.
हे पण वाचा: “मुख्यमंत्री जिथे कोयनेला पोहोचू शकत नाहीत, तिथे ते दिल्लीला काय पोचणार?”, मनसेकडून बोचरी टीका
पुणे येथे पोलीस आयुक्त असताना तेव्हाचे तेथील खासदार असतील वा अन्य नेते असतील त्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप आधीपासून रश्मी शुक्ला यांच्यावर आहे. शुक्ला यांच्याकडून बदलीबाबत जे कारण सांगितले जात आहे त्यात काहीही तथ्य नसल्याचेही मलिक यांनी सांगितले.
Read Also :
- आपलाच पेपर अन् आपलीच जाहिरात; ८८ पानी पेपर छापून सामनाने मुख्यमंत्र्याच्या आवाहनाला दाखवली केराची टोपली
- मोठी बातमी: राजकीय हालचालींना वेग, प्रशांत किशोर बनणार सोनिया गांधींचे सल्लागार?
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर; पूरग्रस्त भागाची करणार पाहणी!
- मनी लाँड्रिंग प्रकरणी: अनिल देशमुखांच्या संरक्षण मिळण्याच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी
- पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी ‘एनटीए’कडून जेईई परीक्षा प्रवेशपत्रे जारी; ३ व ४ ऑगस्ट रोजी होणार परीक्षा