कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, कोकण आणि प.महाराष्ट्रात आलेल्या पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एकापाठोपाठ एक दौरे करत आहेत. आज दोन्ही नेते कोल्हापुरात आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिरोळ येथील नृसिंहवाडी गावाला भेट दिली, तर फडणवीसांनी चिखली गावाला भेट देऊन, ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी दोन्ही नेते कोल्हापुरातील शाहूवाडी चौकात आमने-सामने आले आणि या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थितांनी प्रचंड गर्दी केली होती.
फडणवीस सरकारची चुक अजितदादांनी निस्सारली, २३ गावांच्या निर्णयाचे स्वागतच – प्रशांत जगताप
मुख्यमंत्री आणि फडणवीस समोरासमोर आल्यांनतर, शिवसैनिकांकडून ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’ अशी घोषणाबाजी करण्यात आली. याच दरम्यान, दोन्ही नेत्यांच्यात जवळपास ५ मिनिटं चर्चा झाली. प्रचंड गोंगाट असल्याने चर्चेचं स्वरूप समजू शकलं नाही. मात्र नंतर, “वारंवार येणाऱ्या या पूर परिस्थीवर कायमस्वरूपी उपाय झाला पाहिजे. तसेच, तातडीची मदत दिली गेलीच पाहिजे. यावर लवकरात लवकर सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात यावी, अशी आमच्यात चर्चा झाली,” असं त्याची स्पष्टीकरण दिलं
पंकजांसोबत आजही बहिणीसारखं नातं; फडणवीसांच्या विधानावर, पंकजा मुंडे म्हणतात…
दरम्यान, मुख्यमंत्री आणि फडणवीसांची भेट घडली नसती. मात्र एका नागरिकाने मुख्यमंत्र्यांना सांगितले; की आत्ताच विरोधी पक्षनेते इथून पहाणी करून गेले. यांनतर मुख्यमंत्र्यांनी, “आपण मिळून या भागांची पाहणी करू,” असा संदेश पोहोचवण्यासाठी, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना, फडणवीसांना फोन करायला लावले. तो लागला नाही. मग त्यांनी फडणवीसांचे स्वीय सचिव सुमित वानखेडे यांना फोन करून हा त्यांच्याकडे हा संदेश दिला आणि या दिग्गज नेत्यांची भेट झाली.
‘’मुख्यमंत्री बाळासाहेबांचे वंशज, आमचं म्हणणं जरुर ऐकतील’’, कोल्हापूरकरांची आर्त हाक
यावेळी, मुख्यमंत्र्यांसोबत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, शिवसेना खासदार धैर्यशील माने, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर होते, तर देवेंद्र फडणवीसांसोबत विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. मात्र, कानात केलेल्या कुजबुजीचे गुपित काय आहे, याची मात्र पुढचे काही दिवस चर्चा सुरु राहील हे नक्की!
अखेर पुण्याच्या पीएमआरडीए विकास आराखड्याला मुख्यमंत्र्यांची मंजूरी; २३ गावांच्या विकासाचा मार्ग सुकर
राज्याच्या १३ जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पूराने, आतापर्यंत २१३ लोकांचा मृत्यू झाला असून, ८ जण बेपत्ता आहेत, तर ५२ लोक जखमी झाले असून, ४०० जनावरे आणि ६० हजार कोंबडय़ा दगावल्या आहेत. या पुराचा १४०० गावांना फटका बसला असून, एकूण ४ लाख ३५ हजार लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांना तातडीची १० हजार रुपयांची मदत जाहीर राज्य सरकारने जाहीर केली असून, आजपासून ही रक्कम खात्यावर जमा होणार आहे.
Read Also :
- फोन टॅपिंग: ‘रश्मी शुक्ला यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली होती का?’
- आपलाच पेपर अन् आपलीच जाहिरात; ८८ पानी पेपर छापून सामनाने मुख्यमंत्र्याच्या आवाहनाला दाखवली केराची टोपली
- मोठी बातमी: राजकीय हालचालींना वेग, प्रशांत किशोर बनणार सोनिया गांधींचे सल्लागार?
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर; पूरग्रस्त भागाची करणार पाहणी!
- मनी लाँड्रिंग प्रकरणी: अनिल देशमुखांच्या संरक्षण मिळण्याच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी