नवी दिल्ली : सध्या नवी दिल्लीत संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु असून, विरोधकांनी ‘पिगॅसस प्रोजेक्ट’वरून मोदी सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. संसदेत देखील ते यावरून चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून आलं. त्यांच्या गोंधळामुळे अनेक वेळा आत्तापर्यंत विधानसभेचं कामकाज एकतर थांबवावं लागलं आहे किंवा तहकूब करण्यात आलं. तसेच, या विषयावरूनच महत्त्वाच्या विरोधी पक्षांची काही दिवसांपूर्वी महत्त्वाची बैठक देखील पार पडली.
मोठी बातमी: राजकीय हालचालींना वेग, प्रशांत किशोर बनणार सोनिया गांधींचे सल्लागार?
त्यामुळे, सध्या दिल्लीत मोठ्या प्रमाणावर राजकीय नेत्यांच्या हालचाली सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर आता मोठी घडामोड घडून येत असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट झाली आहे. पवारांच्या निवासस्थानी ही बैठक झाली असून, पंतप्रधान मोदींच्या सुचनेनुसार ही बैठक झाली असल्याची बातमी सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे, राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
या बैठकीत दोन्ही नेत्यांत, संसदेतील गोंधळावर मार्ग काढण्यावर चर्चा झाल्याचं समजत असून, हा विषय सोडवण्यासाठी पंतप्रधानांनी गडकरींना जबाबदारी सोपवली आहे. याचाच भाग म्हणून ही भेट झाली आहे. या भेटीत हा विषय सोडून, राज्यातील परिस्थितीवर आणि सहकार या विषयावर देखील चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. विरोधकांनी पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यापासूनच ‘पिगॅसस प्रोजेक्ट’ वरून विरोधकांना घेरलं आहे.
११ जिल्ह्यात लेवल ३ चे निर्बंध, २५ जिल्ह्यात निर्बंधांत शिथिलता, काय आहेत निर्बंध? वाचा थोडक्यात
दरम्यान, शरद पवार सातत्याने भाजप विरोधी आघाडीला बळकट करण्याच्या प्रयत्नात दिसून येत असून, राजधानीत त्या अनुषंगाने त्यांच्या इतर पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांशी भेटीगाठी सुरु आहेत. काहीच दिवसांपूर्वी त्यांनी ‘राष्ट्रमंच’ ची बैठक आयोजित केली होती. त्यांनतर राष्ट्रीय आणि राजकीय घडामोडींना वेग आला होता. त्यामुळे, शरद पवार मोदी-शहा जोडीला शह देतात का? राष्ट्रीय राजकारणाच्या वर्तुळात तिसरी आघाडी जन्म घेते का? तिला यश मिळते का? हे येत्या काळात पाहणे औत्सुक्याचे ठरणा आहे.
Read Also :
- जेव्हा गरज असेल तेव्हा केंद्राची मदत घेऊ, मात्र वेड्यावाकड्या मागण्या करून पॅकेज जाहीर करणार नाही!
- फडणवीस-ठाकरे आले पुन्हा एकत्र, अवघ्या ५ मिनिटांच्या चर्चेत दडलंय तरी काय?
- कायम पुराचा धोका असणाऱ्या गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावू – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
- पंकजांसोबत आजही बहिणीसारखं नातं; फडणवीसांच्या विधानावर, पंकजा मुंडे म्हणतात…