मुंबई: ‘पेगासस’ या सॉफ्टवेअरचा उपयोग करून पत्रकार, राजकीय नेते आणि आंदोलक यांच्या विरोधात हेरगिरी केली जाते, या आरोपावरून संसदेचा संपूर्ण आठवडा गोंधळातच उलटून गेला आहे. शुक्रवारीही पेगासस हेरगिरी मुद्द्यावरून गोंधळ सुरूच होता. सरकारने विरोधकांशी समेटाचे संकेत शुक्रवारी दिले आहेत.
हे पण वाचा: कायम पुराचा धोका असणाऱ्या गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावू – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
लोकसभा स्थगित झाल्यानंतर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘विरोधकांकडे अजूनही पर्याय आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याप्रकरणी दिलेल्या वक्तव्यावर विरोधक स्पष्टीकरण मागू शकतात.पण मंत्री राज्यसभेत निवेदन करत असताना त्यांच्या हातातील कागद ओढून फाडले गेले.’
हे पण वाचा: कोल्हापूरकरांनी सुनावले फडणवीसांना खडे बोल!
दरम्यान, राज्यसभेतही शुक्रवारी हेरगिरी कांडासह कृषी कायदा आणि महागाईवरून विरोधकांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. दुपारनंतर कृषिमंत्र्यांनी एक विधेयक सादर केले. ते गोंधळातच आवाजी मतदानाने पारित करण्यात आले. त्यानंतर राज्यसभा सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आली.
हे पण वाचा: दणका! ईडीचे अनिल देशमुखांना चौथे समन्स, न्यायालयानेही फेटाळली अटक न करण्याची याचिका
लोकसभेतही झाले नाही कामकाज
लोकसभेत हेरगिरी कांडावरून प्रश्नोत्तराच्या तासात विरोधी सदस्य घोषणाबाजी करत हाती फलक घेऊन उभे राहिले. यावर संसदीय कामकाज मंत्री जोशी म्हणाले की, हा काही मुद्दाच नाही. सरकार जनतेशी निगडित मुद्द्यांवर चर्चेस तयार आहे. आम्ही विनाचर्चा विधेयक मंजूर करू इच्छित नाही. विरोधकांचे वागणे दुर्दैवी आहे.
Read Also :
- मी अपघाताने दिल्लीत आलो, प्रथम महाराष्ट्रातील प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देईल, नितीन गडकरी यांचा शब्द
- काँग्रेसवर होणाऱ्या टीकेला स्वातंत्र्य वारशाची गाथा सांगत प्रत्युत्तर देऊ – नाना पटोले
- अजित पवारांविरोधात सक्षम उमेदवार देऊ; चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा
- पंतप्रधान रोजगार योजनेतील ८८ टक्के उद्योगांना कोरोनाचा फटका – नारायण राणे
- परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ: साडेतीन कोटींच्या खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल