कोल्हापूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, कोकण आणि प.महाराष्ट्रात आलेल्या पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एकापाठोपाठ एक दौरे करत आहेत. आज ते कोल्हापुरात होते. त्यांच्यासोबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर होते. यावेळी, या तिघांनी चिखली गावाला भेट देऊन, ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यानंतर हे तिन्ही नेते मारुतीच्या मंदिरात आले. यावेळी, कोल्हापूरकरांनी त्यांच्या मनातील संताप, खदखद बाहेर काढत फडणवीसांना खडे बोल सुनावले.
दणका! ईडीचे अनिल देशमुखांना चौथे समन्स, न्यायालयानेही फेटाळली अटक न करण्याची याचिका
कोल्हापुरात पंचगंगेला आलेल्या पुराने जमिनी, शेती, घरे उध्वस्त केली. यावेळी पाहणी करून तिन्ही नेते मारुतीच्या मंदिरात आले. त्यावेळी पूरग्रस्तांनी मंदिर आणि मंदिराच्या परिसरात तुडुंब गर्दी केली होती. फडणवीस माईक घेऊन बोलायला लागताच, “तुमच्या काळात आलेल्या महापुराची मदत अजूनही मिळाली नाही. चंद्रकांत पाटलांनी दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही,” असे सांगत ग्रामस्थांनी थेट फडणवीसांनाच खडेबोल सुनावले.
तळीयेसाठी दुःखात सुखाची छोटी फुंकर! पुनर्वसनाची जागा झाली निश्चित
पोटतिडकीने कोल्हापूरकरांच्या मनातील राग बाहेर येत होता. “साहेब, आधीच्या टायमाला चंद्रकांतदादा आले. दादांनी शब्द दिलता. खोटं बोलणार नाही, मंदिरात उभा आहे. दादा तुम्ही शब्द दिलता, याच मंदिरात, मारुती साक्षय हा आमचा, मग नंतर २ वर्षे कुठं गेलं तुमचं प्रशासन?, असा संताप व्यक्त करत एका ग्रामस्थाने फडणवीस यांना जाब विचारला. मात्र याचं त्यांच्याकडं देण्यासारखं काहीच उत्तर नव्हतं.
दिल्लीत भेटले गडकरी-पवार, मोदींच्या सांगण्यावरून झाली “या” विषयावर चर्चा
“तुम्ही कुणीच आम्हाला बघितलं नाही आदित्य ठाकरे साहेब आले, त्यांनीही बघितलं नाही. आमच्यकडे २ वर्षे कुणीच बघितलं नाही. त्यानंतर आज तुम्ही परत इथं आलाय. आता तुम्ही आश्वासन देणार आणि परत जाणार. मग आम्ही आमच्या कामाला आणि तुम्ही तुमच्या कामाला, परत कुणी आमच्याकडे बघणार नाही, मी हे तुम्हाला आत्ता उघड इथेच सांगतो,” अशी वेदना व्यक्त करत ग्रामस्थांनी नेत्यांना उघडं पाडलं. यावेळी तिन्ही नेते निःशब्द झालेले पाह्यला मिळाले.
Read Also :
- जेव्हा गरज असेल तेव्हा केंद्राची मदत घेऊ, मात्र वेड्यावाकड्या मागण्या करून पॅकेज जाहीर करणार नाही!
- फडणवीस-ठाकरे आले पुन्हा एकत्र, अवघ्या ५ मिनिटांच्या चर्चेत दडलंय तरी काय?
- कायम पुराचा धोका असणाऱ्या गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावू – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
- पंकजांसोबत आजही बहिणीसारखं नातं; फडणवीसांच्या विधानावर, पंकजा मुंडे म्हणतात…
- ‘’मुख्यमंत्री बाळासाहेबांचे वंशज, आमचं म्हणणं जरुर ऐकतील’’, कोल्हापूरकरांची आर्त हाक