पुणे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नकार दिल्यानंतरही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा घाट घातला होता. मात्र, ज्या नेत्यांच्या सल्ल्याने राज्य चालले आहे. अशा ‘रिमोट कंट्रोल’ने फोन केला आणि त्यानंतर ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली, असा गौप्यस्फोट करत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.
केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या कुटुंबियांच्या पाठीशी मी भक्कमपणे उभा आहे; फडणवीसांची रोखठोक भूमिका
पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते. ते म्हणाले की, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दादागिरी करून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांना पत्र लिहिले. सकाळी अकरापर्यंत कळवा; नाहीतर तुमची परवानगी गृहीत धरू, असं त्या पत्रात राज्यपालांना म्हटलेले होते. त्या पत्राची भाषाही धमकावण्याची होती. तरीही राज्यपाल ठाम राहिले. त्यांनी नव्या नियमांचा अभ्यास करायचे आहे, असे सांगून निवडणूक तातडीने घेण्यास नकार दिला.
राज्यपालांच्या नकारानंतरही विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा घाट महाआघाडीच्या नेत्यांनी घातला होता. मात्र, ज्या नेत्यांच्या सल्ल्याप्रमाणे राज्य चालले आहे. अशा ‘रिमोट कंट्रोल’ने फोन करून सांगितले की, राज्यपालाच्या संमतीशिवाय निवडणूक घेणे, ही घटनेचे उल्लंघन ठरेल. त्यातून राज्यात राष्ट्रपती राजवट येऊ शकते. त्यांना खुर्ची एवढी प्यारी आहे की त्यामुळे शेवटी ही निवडणूकच पुढे ढकलण्यात आली, असे चंद्रकांतदादांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष; नारायण राणेंची प्रतिष्ठा पणाला
दरम्यान, राज्यपालांच्या विरोधानंतरही सर्व तामझाम करून आघाडी सरकारने निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीला केलेला विरोध आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवडणूक न घेण्याचा दिलेला सल्ला यामुळे अखेर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक न घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
ते पुढे म्हणाले की, मुळातच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नको होती. या दोन्ही पक्षांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी निवडणूक घेण्याचा केवळ फार्स केला. दम होता तर का घेतली नाही निवडणूक? असा सवालही चंद्रकांत पाटलांनी केला. महत्वाचे म्हणजे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक रेटून नेण्याचा डाव आम्ही हाणून पाडला, असा दावाही त्यांनी केला.
Read also:
- हुर्ररररर… हवेतच; बैलगाडा शर्यत सुरू करण्याला पुन्हा ब्रेक?
- कोल्हापुरातील अदानी-अंबानी जोडगोळीपासून सावधान राहा; खासदार मंडलिकांची मुश्रीफ, बंटी पाटलांवर नाव न घेता टीका
- “सरकारमधून बाहेर पडून भाजपसोबत सत्तास्थापनेसाठी चढाओढ”; चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट
- मोठी बातमी: नितेश राणे यांना धक्का, अटकपुर्व जामीन न्यायालयाने फेटाळला
- कोरोना रुग्णसंख्या दोन दिवसांत दुप्पट, राज्यासाठी धोक्याची घंटा – राजेश टोपे