पुणे : माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वात बैलगाडा शर्यतीचा लढा देण्यात आला. अखेर सात वर्षाच्या लढ्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाली. पुण्यात तळेगाव आणि आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी घाटात 1 जानेवारीला भिर्रर्र..आवाज घुमणार होता. बैलगाडा शर्यतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनीही सशर्त परवनगी दिली होती. त्यामुळे पहिली बारी कोणाची होणार? या श्रेयासाठी विविध नेत्यांमध्ये चढाओढ सुरू झाली होती. मात्र कोरोना विषाणू आणि ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आज रात्री पासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे बैलगाडा शर्यतीलाही पुन्हा ब्रेक लागणार असल्याने बैलगाडा मालक आणि बैलगाडा प्रेमींमध्ये नाराजीचा सुर झाला आहे.
“नारायण राणे सर्वांना पुरून उरणार आहेत”; चंद्रकांत पाटलांचा राणेंना पाठिंबा
शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटलांनी तर तळेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने 1 जानेवारी 2022 ला नवीन वर्षांच्या पहिल्याच बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे. त्याचबरोबर भाजप आमदार महेश लांडगे यांनी देखिल बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. या शर्यतीसाठी लाखो रुपयांची बक्षीसेही जाहिर करण्यात आली आहेत. इतकेच नव्हे तर, बैलगाडा घाट शर्यतीसाठी सज्ज झाले आहेत. मात्र आज मध्यरात्रीपासून राज्यसरकारकडून कोरोना विषाणू आणि ओमिक्रॉनचा वाढता संभाव्य धोका लक्षात घेता राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर कडक निर्बंध लागू करत लग्न समारंभ, अंत्यसंस्कार यावर संख्येवरही निर्बंध लागू करण्यात आहे..!
“नितेश राणेंना कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा राजाश्रय?”; संजय राऊत यांनी व्यक्त केला संशय
सात वर्षाच्या प्रतिक्षेनंतर बैलगाडा घाट गर्दीने फुलुन भंडाराची उधळण करत वाजत गाजत भिर्रर्रर्र….र्र…ची शर्यत भरणार होती. मात्र कोरेनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा बैलगाडा शर्यतीला ब्रेक लागणार असल्याने बैलगाडा मालक चालकांमध्ये, शौकिनांनी आता नाराजीचा सुर आळवला आहे.
कणकवलीत जिल्हा बँकेचे मतदान पार पडल्यानंतर सेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा
दरम्यान, सर्वोच्च न्यायालायाने बैलगाडा शर्यतींना सशर्त परवानगी दिल्या नंतर महाराष्ट्र सर्व प्रथम बैलगाडा शर्यत लांडेवाडीत उद्या खासदार शिवाजी आढळराव-पाटील यांच्या नेतृत्त्वात आयोजित करण्यात आली आहे. या बैलगाडा शर्यतीसाठी येणाऱ्या बैलगाडा मालकांना टोकण नंबर घेणे बंधनकारक केले होते. त्या निमित्ताने गुरुवारी तब्बल 703 बैलगाडा मालकांनी टोकण घेत नोंदणी केली. गुरुवारी सकाळपासूनच टोकण घेण्यासाठी मोठया संख्येने बैलगाडा मालक जमले होते. संपूर्ण गावाला यात्रेचे स्वरूप आले होते. मात्र कोरोना निर्बंधांमुळे आता या शर्यतीलाही ग्रहण लागणार असल्याचे दिसत आहे.
Read also:
- कोल्हापुरातील अदानी-अंबानी जोडगोळीपासून सावधान राहा; खासदार मंडलिकांची मुश्रीफ, बंटी पाटलांवर नाव न घेता टीका
- “सरकारमधून बाहेर पडून भाजपसोबत सत्तास्थापनेसाठी चढाओढ”; चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट
- मोठी बातमी: नितेश राणे यांना धक्का, अटकपुर्व जामीन न्यायालयाने फेटाळला
- कोरोना रुग्णसंख्या दोन दिवसांत दुप्पट, राज्यासाठी धोक्याची घंटा – राजेश टोपे
- देवेंद्रजी आपण उद्या मुख्यमंत्री, पंतप्रधानही व्हाल; पण…; संभाजीराजेंनी स्पष्टच सांगितले