सिंधुदुर्ग – भाजप आमदार नितेश राणेंच्या जामीन अर्जावर आज पुन्हा कोर्टात सुनावणी होत आहे, मात्र मतदान संपल्यानंतर कणकवलीत भाजप आणि सेना कार्यकर्ते पुन्हा आमनेसामने आल्याचे दिसून आले. यावेळी दोन्हीकडील कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, शांतता राखण्यासाठी यावेळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. अजूनही कणकवलीत तणावाचे वातावरण आहे.
राणेंना पोलिस ठाण्यात बोलाविणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर FIR दाखल करा – देवेंद्र फडणवीस
कणकवलीत आज जिल्हा बँकेसाठी मतदान पार पडले आहे, यावेळी मतदान संपताच शिवसेना कार्यकर्त्यांनी फटाके फोडले, त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक होत जोरदार घोषणाबाजी सुरू केली, त्यानंतर मोठा हायव्होल्टेज ड्रामा येथे सुरू झाला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना आवर घालण्याचा आणि शांतता राखण्याचा प्रयत्न केला, मात्र जोरदार राडा होण्याची शक्यता निर्माण झाल्याने पोलिसांनी दंगल नियंत्रक पथकाला बोलावले. तरीही कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी सुरूच होती.
आज नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज पुन्हा सुनावणी होत आहे, मात्र त्याआधी कणकवलीत भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते पुन्हा आमनेसामने आले आहेत. याठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असलेल्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांना अटक यांना करण्यात यावी, याकरिता शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी सोमवारी कणकवली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता.
अखेर मुंडे साहेबांसह बीडकरांच स्वप्न सत्यात उतरलं; अहमदनगर ते आष्टीदरम्यान धावली ट्रेन
तर दुसऱ्या बाजूला सभागृहात शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनीही नितेश राणे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर कणकवली पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, नितेश राणे सध्या अज्ञातवासात गेले आहेत. शिवाय त्यांच्या जामिनावरची आज सुरू असलेली सुनावणीही आता उद्या होणार आहे. याच अनुषंगाने नितेश कुठे आहेत, याची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी नारायण राणे यांना नोटीस बजावली होती. त्यांच्या घरावर ही नोटीस चिपकावण्यात आली. मात्र, दहा मिनिटांत ही नोटीस काढून टाकण्यात आली.
Read also:
- “नितेश राणेंना कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा राजाश्रय?”; संजय राऊत यांनी व्यक्त केला संशय
- पवारांच्या ‘त्या’ एका वाक्यामुळे भाजप-शिवसेनेत अंतर वाढलं, आणि भाजपचा घात झाला.. ते वाक्य कोणतं?
- इतर वेळी खाडकन बोलणारे अजित पवार पहाटेच्या शपथविधीविषयी काहीच का बोलत नाहीत?
- “तुमचा इतिहास खरं न बोलण्याचा, विश्वास कोण ठेवणार”; चंद्रकांत पाटलांनी पवारांचा इतिहासच काढला
- “नारायण राणे सर्वांना पुरून उरणार आहेत”; चंद्रकांत पाटलांचा राणेंना पाठिंबा