पुणे : मागील काही दिवसापासून राज्यात हिंदुत्वाचा मुद्दा ज्वलंत होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये याबाबत जोरदार खडांजगी बघायला मिळत आहे. तर भाजपने देखील हा मुद्दा जोरदार लावून धरला आहे. येत्या 5 जून रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे काही कार्यकर्त्यांसह आयोध्या दौरा करणार आहे. अशातच आता राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवार सध्या आयोध्यात दाखल झाले असून त्यांच्याबाबत सध्या राज्यात जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत.
मनसे नेते संदीप देशपांडे अजूनही फरार, पोलिसांकडून ड्रायव्हरला अटक
रोहित पवार सहकुटुंबासह सध्या उत्तर प्रदेशच्या चार दिसवसांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल तथागत गौतम बुद्धांचे वास्तव असलेल्या सारनाथला भेट दिली. तसेच आज दुपारी ते आयोध्येत असणार आहेत. त्यांनी याबाबत एक फेसबुक पोस्ट देखील केली आहे. उत्तर प्रदेशमधील विविध धार्मिक स्थळांना ते भेटी देणार आहेत. त्यामुळे आयोध्या भेटीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
राज यांच्या मागे कोर्टाचा ससेमिरा; राज ठाकरेंच्या अडचणीत वाढ
रोहित पवारांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे की, हिंदू धर्मातील सर्वांत महत्त्वाचं तिर्थक्षेत्र कोणतं असेल तर ते गंगा नदीच्या तीरावर वसलेलं वाराणसी. मुक्ती आणि शुद्धीकरणासाठी देशभरातून असंख्य भाविक इथं नियमित येत असतात. वृंदावन आणि मथुरेला भेट दिल्यानंतर आम्हीही वाराणसीमध्ये आलो. वाराणसी हे हिंदू धर्मासाठी सात पवित्र शहरांपैकी एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ आहे. प्रसिद्ध संत कबीर यांचीही जन्मभूमी वाराणसी आहे. इथं अनेक विशाल मंदिरांव्यतिरिक्त, घाट आहेत. हे स्थळ केवळ भारतीयांसाठीच नाही तर परदेशी पर्यटकांच्या आकर्षणाचंही केंद्रबिंदू आहे. भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी काशी विश्वनाथ मंदिर हे वाराणसीमध्ये गंगा नदीच्या तीरावर आहे.
गुन्हे केवळ आमच्यावरच सिद्ध होतात इतरांवर नाही; राणा दाम्पत्याच्या जामिनावर राऊतांचा टोला
शंकराचार्य, संत एकनाथ, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद, गोस्वामी तुलसीदास यांसारख्या अनेक संत आणि महापुरुषांनी या मंदिराला भेट दिली आहे. या मंदिराला साडेतीन हजार वर्षांचा इतिहास आहे. या मंदिरावर अनेक वेळा हल्ला झाला परंतु त्यानंतर पुन्हा ते बांधले गेले. सध्याचं मंदिर हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी १७८० मध्ये बांधलं. या मंदिराशी नातं सांगणारा हा इतिहास माझ्यासाठी विशेष जिव्हाळ्याचा आहे. कारण पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म ज्या चौंडीमध्ये झाला त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळालीय. त्यामुळं सध्याच्या श्री विश्वनाथ मंदिराचा हा इतिहास माझ्यासाठी विशेष आस्थेचा भाग आहे. या मंदिरात कुटुंबासह पूजा-अभिषेक करुन श्री विश्वनाथाचं आम्ही सर्वांनी मनोभावे दर्शन घेतलं. खरंच विश्वनाथाच्या दर्शनाचा आनंद आणि समाधान काय असतं आणि यातून काय मिळतं हे शब्दांत सांगण्यापलीकडचं आहे.
Read also:
- ओबीसी आरक्षण पुन्हा लागू करण्यासाठी राज्य सरकारने काय केले सांगा – चंद्रकांत पाटील
- ओबीसी आरक्षण पुन्हा लागू करण्यासाठी राज्य सरकारने काय केले सांगा – चंद्रकांत पाटील
- आमदार रवी राणा यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र..म्हणाले,
- उद्धव ठाकरेंचा भावाला धक्का; कल्याण डोंबिवलीतील मनसे कार्यकर्ते शिवसेनेत
- “कशासाठी काढताय तुम्ही भोंगे..का करताय तुम्ही अशी सोंगे?”; आठवलेंनी टोचले ठाकरे बंधूंचे कान