ऑनलाइन शाळादेखील ऑफलाइन सुरू झाल्या आहेत. आता तरी मुख्यमंत्र्यांनी ऑनलाइनपेक्षा राज्यात फिरावे असा हल्लाबोल अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी केला आहे. आमच्यावर झालेली कारवाई ही सूडबुद्धीने झाली असून देशातील जनता हे पाहत असल्याचे त्यांनी म्हटले.
“कुणी राजकीय बाजार भरवत असेल तर त्यालाही..”; राष्ट्रवादीचा मनसेला कडक इशारा
राजद्रोहाच्या आरोपात अटक झालेले अमरावतीचे आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांची 12 दिवसानंतर तुरुंगातून सुटका झाली. नवनीत राणा या लीलावती रुग्णालयात दाखल आहेत. रवी राणा यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्यांनी म्हटले की, ज्या राज्यांमध्ये महिलांचा सन्मान केला जातो. त्या महाराष्ट्रात एका महिलेला चुकीची वागणूक दिली. सहा दिवसांआधी नवनीत राणा यांची प्रकृती बिघडली होती. त्यावेळी त्यांच्यावर कोणतेही उपचार करण्यात आले नव्हते. त्यांना त्रास देण्यात आल्याने त्या दु:खी असल्याचे रवी राणा यांनी म्हटले.
“मराठा आणि ओबीसी समाजाला कळून चुकलं की पवारसाहेब काय आहेत. मराठा आरक्षणासाठी त्यांनी काय केलं?”
महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची दडपशाही कधी झाली नव्हती, असा आरोपही त्यांनी केला. सूडबुद्धीने आमच्यावर कारवाई झाली असून सरकारकडून एका महिलेचा मोठा अपमान झाला असल्याचा आरोप राणा यांनी केला. तुरुंगात नवनीत राणांना दिलेली वर्तवणूक अयोग्य होती. तुरुंग प्रशासन राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे. तुरुंग प्रशासनाने मुख्यमंत्र्याच्या आदेशाने त्रास दिला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
Read also:
- उद्धव ठाकरेंचा भावाला धक्का; कल्याण डोंबिवलीतील मनसे कार्यकर्ते शिवसेनेत
- “कशासाठी काढताय तुम्ही भोंगे..का करताय तुम्ही अशी सोंगे?”; आठवलेंनी टोचले ठाकरे बंधूंचे कान
- मनसे नेते संदीप देशपांडे अजूनही फरार, पोलिसांकडून ड्रायव्हरला अटक
- राज यांच्या मागे कोर्टाचा ससेमिरा; राज ठाकरेंच्या अडचणीत वाढ
- “मराठी माणसांच्याही मर्सिडीज असायला पाहिजेत, पण कष्टाच्या; चोरीच्या नको” संजय राऊतांचा फडणवीसांना टोला
- “त्यांना आपला भाऊ मुख्यमंत्री झाल्यावरच त्रास सुरु झाला”