बीड – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामागच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असून, आता परळी जिल्हा न्यायालयाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. 2008 मध्ये राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ परळी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी एसटी महामंडळाच्या बसवर दगडफेक केली होती. या प्रकरणात हे वॉरंट बजावण्यात आले आहे. न्यायालयाने राज यांना अनेकदा सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. विशेष म्हणजे राज यांना या प्रकरणात जामीन मिळूनही, ते सुनावणीला हजर राहिले नाहीत. त्यामुळे हे वॉरंट बजावण्यात आल्याचे समजते.
एनडीएच्या विस्तारासाठी भाजपाची नवी योजना; शिवसेनाची जागा मनसे घेणार?
राज ठाकरे यांना तीन दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यातल्या शिराळा न्यायालयानेही अटक वॉरंट जारी केले आहे. 6 एप्रिल रोजी हे वॉरंट बजावूनही पोलिसांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे परळी न्यायालयाने बजावलेल्या वॉरंटवर तरी पोलिस कारवाई करणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय राज ठाकरे पुढे काय करणार? सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी न्यायालयाकडे आणखी वेळ मागून घेणार का, हे पाहणेही उत्सुकतेचे ठरणार आहे.
“राज ठाकरे उत्तम व्यंगचित्रकार, पण भाजपने हात कलम केले, भोंगावादाचा हिंदूंवर बूमरँग होणार”
राज ठाकरे यांनी पाडव्यादिवशी शिवतीर्थावर सभा घेतली. या सभेत त्यांनी अचानक आपली राजकीय भूमिका बदलली. इतक्यादिवस लाव रे तो व्हिडीओ म्हणत भाजपवर टीका करणारे राज यांनी अचानक हिंदुत्वाची शाल पांघरली. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेश सरकारचे तोंडभरून कौतुक केले. याच सभेत त्यांनी भोंग्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावरून अजूनही राज्यात राजकीय खणाखणी सुरू आहे. राज यांच्या या भूमिकेचे भारतीय जनता पक्षाने स्वागत केले, पण काँग्रेससह शिवसेना आणि राष्ट्रवादीने त्यांच्यावर टीकेच झोड उठवली. आता राज ठाकरे पुढे काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल.
Read also:
- “मराठी माणसांच्याही मर्सिडीज असायला पाहिजेत, पण कष्टाच्या; चोरीच्या नको” संजय राऊतांचा फडणवीसांना टोला
- “त्यांना आपला भाऊ मुख्यमंत्री झाल्यावरच त्रास सुरु झाला”
- गुन्हे केवळ आमच्यावरच सिद्ध होतात इतरांवर नाही; राणा दाम्पत्याच्या जामिनावर राऊतांचा टोला
- “मराठा आणि ओबीसी समाजाला कळून चुकलं की पवारसाहेब काय आहेत. मराठा आरक्षणासाठी त्यांनी काय केलं?”
- “कुणी राजकीय बाजार भरवत असेल तर त्यालाही..”; राष्ट्रवादीचा मनसेला कडक इशारा
- राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षापदी विद्या चव्हाण यांची वर्णी; पहिल्यांदाच विभागनिहाय अध्यक्षांचीही निवड