पुणे – भोंग्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण गेल्या काही दिवसापासून कमालीचं तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली भुमिका त्यासाठी कारणीभूत आहे. काही ठिकाणी मशिदीवरील भोंगे शांततेने बंद ठेवण्यात आले. मात्र अजूनही मुंबईतील काही मशिदीवरील भोंग्यामशद्वारे अजाण देण्यात आली. त्यामुळे पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतले. याचाच धागा पकडत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
तसेच राज्यात या दरम्यानच्या काळात शांतता ठेवल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभारही मानले आहेत. ते म्हणाले की, कोणाच्याही चिथावणीला बळी न पडता राज्यात शांतता राखल्याबद्दल राज्यातील जनतेचे आणि पोलीसांचे मनःपूर्वक आभार. महाराष्ट्र आणि इथला सर्व समाज हा शांतताप्रिय आणि सर्वधर्मसमभाव मानणारा आहे, हे पुन्हा एकदा पहायला मिळालं. हा आपला महाराष्ट्र धर्म आणि आपली एकजूट कायम राहील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
धर्म, निष्ठा, श्रद्धा हे प्रत्येकाचे व्यक्तिगत विषय आहेत. त्याचा आदर सर्वांनीच केला पाहिजे. पण त्याचा कुणी राजकीय बाजार भरवत असेल तर त्यालाही रोखलं पाहिजे. असा इशाराही त्यांनी दिला आहे. महागाईपासून बेरोजगारीपर्यंत सर्वसामान्यांना भेडसावणारे अनेक प्रश्न आज देशात आहेत. त्यावर आवाज उठवण्याची आज अधिक गरज आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
आघाडीला धक्का देत कॉंग्रेस वंचितसोबत जाण्याची शक्यता; महापालिकेच्या निवडणुकांचं बिगुल लवकरच वाजणार
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत घेतलेली भुमिकेमुळे राज्यातील राजकारण चांगलचं तापलं आहे. राज ठाकरे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत काल काही कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेत. त्यामुळे ठिकठिकाणी पोलिसांनी कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतले आहे. तर दादर मध्ये मनसे नेते संदीप देशपांडे यांना ताब्यात घेतावेळी पोलीस महिलेला दुखापत झाल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. त्यावर आता संदीप देशपांडे यांनी देखील त्यांच्या वरील आरोप फेटाळून लावले आहेत.
Read also:
- राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षापदी विद्या चव्हाण यांची वर्णी; पहिल्यांदाच विभागनिहाय अध्यक्षांचीही निवड
- भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी भाजप सरकार जबाबदार; शरद पवारांची साक्ष
- दानवे म्हणाले, ‘ब्राम्हण मुख्यमंत्री’, अजितदादा म्हणाले, ‘तृतीयपंथी मुख्यमंत्री’?
- राज्यात मनसेचं जोरदार आंदोलन; गैरहजर असणाऱ्या वसंत मोरेंनी सोडलं मौन, म्हणाले..;
- तुरुंगातुन सुटका होताच, नवनीत राणा रूग्णालयात दाखल; अनेक व्याधींनी त्रस्त
- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शरद पवार ॲक्शन मोडवर; घेतला ‘हा’ मोठा निर्णय